शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'ही' आहेत हाय ब्लडप्रेशरची कारणं, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:42 IST

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तसंच वाढत्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तसंच वाढत्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसंच दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे नकळतपणे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. आजकाल प्रत्येक व्यक्तीला रक्तदाबाशी निगडीत समस्या उद्भवतात. 

हायपरटेंशन म्हणजेच हाई ब्लड प्रेशरचा आजार अनेक लोकांना उद्भवतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि झोपेच्या वेळा अनियमीत असल्यामुळे ही समस्या सर्वाधीक उद्भवते. रक्तदाबासंबंधी असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास हार्टस्ट्रोक किंवा  हृद्याशी संबंधीत आजार उद्धवण्याचा धोका अधिक असतो. तर मग जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे हायब्लड प्रेशरची समस्या उद्भवते.

मद्यपान आणि धुम्रपान 

धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत निकोटिन आणि कार्बन मोनोक्साइड ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात. मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते. जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांचा दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. 

मिठाचं सेवन अधिक करणे

नकळतपणे जेवताना जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील रक्तदाबाची समस्या वाढण्याचा धोका असतो. मिठात सोडियम जास्त प्रमाणात असल्यामुळे याचा नकारात्मक परीणाम हृद्यावर होत असतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनशील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने  आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केलं तर अशा रुग्णाचा रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते.

ताण-तणाव

आयुष्यात जर तुम्हाला जास्त ताण- तणावाच्या परिस्थीतीचा सामना करावा लागत असेल तर रक्तदाबाची समस्या अधिक उद्भवते. ताण-तणावामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना  करावा लागतो. यापासून बचाव करायचा असल्यास जितकं शक्य होईल तितकं आनंदी रहा.

बाहेरचे अन्नपदार्थ जास्त खाणे 

आहारात मीठयुक्त पदार्थ उदा.वेफर्स, कुरकुरे, बर्गर जास्त प्रमाणात घेतले जातात. या चुकीच्या आहारसवयीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यासाठी ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तेलकट पदार्थ खाणं टाळा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य