शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

भारतीयांची 'इम्युनिटी' घटली अन् देशात टीबीचे रुग्ण वाढले; जागरूकतेचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:55 IST

योग्य आहार न मिळणेही ठरतेय कारण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील क्षयरुग्णांची संख्या पाहता भारताला टीबीमुक्त करण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणे सहज शक्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे टीबीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनानंतर टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जागरूकतेचा अभाव, योग्य आहार न मिळणे, स्वच्छतेचा अभाव, कमकुवत प्रतिकारशक्ती, अमली पदार्थांचे व्यसन, कुपोषण, योग्य उपचार न घेणे आदी कारणेही टीबीचे रुग्ण वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.

सर्वाधिक प्रकरणे कुठे?

  • बिहार - १,६७,१९३
  • मध्य प्रदेश - १,४९,०९३
  • राजस्थान- १,४५,४०५
  • गुजरात- १,१३,४३१
  • दिल्ली- ८८,८६८
  • पश्चिम बंगाल- ८३,९६२
  • तामिळनाडू- ७७,८२०
  • हरयाणा- ७३,७०३

(ऑक्टोबर २०२४ पर्यंतची आकडेवारी)

...मग चाचणी करा

  • बराच वेळ सतत ताप येणे.
  • सतत खोकल्याची समस्या.
  • थुंकीत रक्तस्त्राव.
  • रात्री घाम येणे.
  • शरीराच्या विविध भागांमध्ये गुठळ्या.
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • सतत छातीत दुखणे.
  • सतत थकवा, भूक न लागणे.

सहा राज्यांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण

देशातील सहा राज्ये अशी आहे तिथे क्षयरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५ लाख ६३ हजार ५७३, महाराष्ट्रात १ लाख ८६ हजार ७०६, बिहारमध्ये १ लाख ६७ हजार १९३ रुग्ण आढळले आहेत.

देशात टीबी रुग्ण किती? (जानेवारी ते डिसेंबर)

  • २०२०    १८,०५,६७०
  • २०२१    २१,३५,८३०
  • २०२२    २४,२२,१२१
  • २०२३    २५,५२,२५७
  • २०२४    २३,९४,२९२
टॅग्स :IndiaभारतHealthआरोग्य