शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

भारतीयांची 'इम्युनिटी' घटली अन् देशात टीबीचे रुग्ण वाढले; जागरूकतेचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:55 IST

योग्य आहार न मिळणेही ठरतेय कारण

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील क्षयरुग्णांची संख्या पाहता भारताला टीबीमुक्त करण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणे सहज शक्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे टीबीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनानंतर टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जागरूकतेचा अभाव, योग्य आहार न मिळणे, स्वच्छतेचा अभाव, कमकुवत प्रतिकारशक्ती, अमली पदार्थांचे व्यसन, कुपोषण, योग्य उपचार न घेणे आदी कारणेही टीबीचे रुग्ण वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.

सर्वाधिक प्रकरणे कुठे?

  • बिहार - १,६७,१९३
  • मध्य प्रदेश - १,४९,०९३
  • राजस्थान- १,४५,४०५
  • गुजरात- १,१३,४३१
  • दिल्ली- ८८,८६८
  • पश्चिम बंगाल- ८३,९६२
  • तामिळनाडू- ७७,८२०
  • हरयाणा- ७३,७०३

(ऑक्टोबर २०२४ पर्यंतची आकडेवारी)

...मग चाचणी करा

  • बराच वेळ सतत ताप येणे.
  • सतत खोकल्याची समस्या.
  • थुंकीत रक्तस्त्राव.
  • रात्री घाम येणे.
  • शरीराच्या विविध भागांमध्ये गुठळ्या.
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • सतत छातीत दुखणे.
  • सतत थकवा, भूक न लागणे.

सहा राज्यांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण

देशातील सहा राज्ये अशी आहे तिथे क्षयरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५ लाख ६३ हजार ५७३, महाराष्ट्रात १ लाख ८६ हजार ७०६, बिहारमध्ये १ लाख ६७ हजार १९३ रुग्ण आढळले आहेत.

देशात टीबी रुग्ण किती? (जानेवारी ते डिसेंबर)

  • २०२०    १८,०५,६७०
  • २०२१    २१,३५,८३०
  • २०२२    २४,२२,१२१
  • २०२३    २५,५२,२५७
  • २०२४    २३,९४,२९२
टॅग्स :IndiaभारतHealthआरोग्य