शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

heart attack: कमी वयात या कारणांमुळे येतो हार्ट अटॅक, तज्ज्ञांनी सांगितले यावरील सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 17:45 IST

आपल्या देशात हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावणाऱ्यांमध्ये जवळपास २५ टक्के रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६७ टक्के आहे.

आजकाल अगदी तरुण वयातही हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) मृत्यू होण्याचं, तसंच हृदयाशी संबधित आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी ३० ते ४० वर्षं वयोगटातल्या व्यक्तींनाही हृदयविकारांवरची औषधं घ्यावी लागत असून, त्यांच्यामध्येदेखील हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ६०ते ६५ वर्षं वयोगटातल्या बहुतांश नागरिकांना हृदयाशी संबंधित आजारांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याचं प्रमाण अधिक आहे.

आपल्या देशात हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावणाऱ्यांमध्ये जवळपास २५ टक्के रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६७ टक्के आहे. हृदयविकाराचा धोका वाढण्यामागे बदललेली जीवनशैली (Lifestyle), अयोग्य आहार पद्धती (Diet), अंमली पदार्थांचं व्यसन, ताणतणाव (Stress) ही महत्त्वाची कारणं आहेत. तसंच या आजाराची कारणं, लक्षणं आणि उपाय यांबाबत लोकांमध्ये जागरूकताही कमी आहे. त्यामुळे जनजागृती निर्माण केल्यास आणि योग्य वेळी योग्य औषधोपचार, जीवनशैलीत बदल आदी उपाययोजना केल्यास हा धोका टाळता येणं शक्य आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हृदय हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. संपूर्ण शरीराला शुद्ध रक्तपुरवठा (Blood Circulation) करण्यासाठी हृदय एखाद्या पंपाप्रमाणे काम करतं. जेव्हा हृदय शरीराच्या आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करू शकत नाही, तेव्हा हृदय बंद पडतं. अनेक कारणांमुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. हळूहळू त्याची कार्यक्षमता कमी होते, हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानं हृदय बंद पडण्याचा धोका वाढतो.

आपल्या देशात हृदय बंद पडण्याच्या घटना घडण्याचं प्रमाण सर्वाधिक असून, आनुवंशिकपणे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा आजार जडण्याचं प्रमाणही अधिक आहे. देशातली मोठी लोकसंख्या रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त आहे. यामागे अयोग्य जीवनशैली हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, असं मोहाली इथल्या फोर्टिस हॉस्पिटलचे (Fortis Hospital) इंटरव्हेंशनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. आर. के. जसवाल यांनी सांगितलं. आज तकने याविषयी वृत्त दिले आहे.

मीडिया अहवालानुसार काही सोप्या उपायांनी या आजारांना दूर ठेवणं शक्य आहे असं जसवाल म्हणाले. ३० वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी नियमितपणे आपली आरोग्य तपासणी (Health Check-up) केली पाहिजे. यामुळे वेळीच आजाराचं निदान होतं आणि वेळीच उपचार करता येतात. योग्य आहार घेणं हेदेखील अत्यंत आवश्यक आहे. साखर, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ अतिशय घातक आहेत. असे पदार्थ खाणं बंद करणं गरजेचं आहे. धूम्रपान (Smoking), दारू पिणंदेखील (Alcohol) अतिशय घातक असून त्यापासूनही दूर राहिलं पाहिजे.

भारतीयांच्या आहारात मिठाचं प्रमाणही अधिक असतं. प्रत्येक व्यक्तीनं दररोज पाच ग्रॅमपेक्षा अधिक मीठ खाणं टाळलं पाहिजे. काही व्यक्तींच्या आहारात हे प्रमाण 15 ग्रॅम इतकं खूप जास्त असतं. हृदयाच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात. नियमित व्यायाम करणं, आरोग्य तपासणी करणंदेखील आवश्यक आहे. तरच हृदयविकाराच्या धोक्यापासून स्वत:चा बचाव करणं शक्य होईल, असं डॉ. आर.के. जसवाल यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग