शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 3:49 PM

Hearing loss with covid-19 : इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे

कोरोना संक्रमणामुळे फक्त फुफ्फुसं आणि हृदयावरच नाही तर तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित लोकांमध्ये कर्णबधिपणाची समस्या जाणवत आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की,  रुग्णालयातून उपचार घेऊन परत आलेल्या  १३ टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टर आणि एनआयएचआर मॅनचेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर (बीआरसी)च्या वैज्ञानिकांनी अध्ययनातून हा खुलासा केला आहे. प्राध्यापक केविन मुनरो यांनी या अभ्यासादरम्यान  अशा ५६ लोकांना निवडलं ज्यांना कोरोनाच्या संक्रमाणानंतर कमी ऐकायला येत होते. ऐकण्याची समस्या उद्भवत असलेल्या ७.६ टक्के  लोकांना ऐकून येत नव्हतं तर १४.८ टक्के लोकांना  अनावश्यक आवाज ऐकू येत होते. तर चक्कर येत असलेल्या लोकांची  संख्या ७.२ होती.

तज्ज्ञ काय सांगतात

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमधले प्राध्यापक आणि संशोधक केविन मुनरो यांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, याबाबत तज्ज्ञांनी अधिक लक्ष द्यायला हवं. कोरोनाचा सामना करत असलेल्यांना कानांची दीर्घकालीन समस्या उद्भवू शकते. याआधीही मेनिन्जाइटिस आणि  गोवर या आजारांमुळे ऐकण्याची समस्या कमी झालेली पाहायला मिळाली. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

यापूर्वी, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 'जर्नल बीएमजे' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी म्हटले होते आहे की 45 वर्षीय कोविड -१९ पेशंटला  योग्य प्रकारे ऐकू येत नसल्याची समस्या उद्भवली होती. या रुग्णाला कोरोनाच्या उपचारांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून गेल्यानंतर त्यांना कानात मुंग्या येणे आणि ऐकू न येण्याची समस्या जाणवली. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, कोरोनाकाळाच त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला