शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, नेमकं काय करावं सुचतच नाही; खास टिप्स तुमच्यासाठी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:55 IST

पाऊस सुरू होणं आणि शाळा सुरू होणं हे अगदी हातात हात घालूनच येतात.

Parenting Tips : येत्या काही दिवसात मुलांच्या शाळा सुरू होतील आणि अशातच पाऊसही जोर धरू लागला आहे. अचानक जोरात पाऊस येणं, भिजणं आणि मग किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सुरू होणं हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः या गोष्टी लहान वयाच्या मुलांमध्ये खूप कॉमन आहेत. त्यात मुलांच्या खाण्याच्या बदलत्या सवयी अजून भर घालतात. आई-बाबांनी मुलांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. पण तरीही मुलं आजारी पडतात. त्यांच्या काहीतरी बारीकसारीक तक्रारी चालूच राहतात आणि त्याचं कारण मात्र लक्षात येतच नाही. ते खरं कारण असतं बदलता ऋतू आणि वातावरणीय बदल. हवामानात, पाण्यात,आहारात वातावरणातील बदल समजून त्यात बदल केले की इन्फेक्शन आणि तब्येतीच्या तक्रारी टाळता येतील, असं आरोग्यतज्ज्ञाचं म्हणणं आहे. 

काय करायला हवं? काही नियम तुमच्यासाठी... 

१) बरीच मुलं दही, ताक, गार दूध हे पदार्थ आवडीने खातात. पण असे पदार्थ खाणं पावसाळ्यात टाळावं. दुधात थोडं पाणी घालून, पाव चमचा सुंठ पूड घालून दूध उकळावे व ते दूध प्यायला द्यावे. त्यामुळे मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही.

२) दुधात साखर घालून दिल्याने शरीरात कफ दोष वाढतो आणि लहान वय हे वाढीचे असल्यामुळे मुळातच लहान मुलांमध्ये कफाचे प्रमाण अधिक असते आणि साहजिकच कफाचे आजारही त्यामुळे पटकन होतात. म्हणून दुधात साखरेऐवजी मध घालून दिलं तर जास्त चांगलं. फक्त त्यावेळी दूध कडकडीत गरम नको.

३) मुलं भिजून आली तर त्यांचं अंग लगेच कोरडं करावं, डोकं पुसावं आणि आल्याचा थोडा रस मध मिसळून चाटवावा.

४) संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ अशी कफवर्धक फळं त्यांना देऊ नयेत. आईस्क्रीम, मिल्कशेक्स इ. पदार्थ देऊ नयेत.

५) चीज, पनीर हे पदार्थ लहान मुलं आवडीने खातात. त्यामुळे त्यांच्या आहारात बऱ्याच प्रमाणात या गोष्टी समाविष्ट केल्या जातात. परंतु, ते पचायला तर जड आहेतच पण शरीरात चिकटपणा व पर्यायाने कफ दोष वाढवतात. त्यामुळे चीज, पनीर एरव्हीही आणि विशेषतः पावसाळ्यात पचनशक्ती मंद झालेली असताना तर अजिबात देऊ नयेत.

६) शरीरातील कफ दोष नियंत्रित राहावा, यासाठी कोरडे पदार्थ चांगले काम करतात. म्हणून या मुलांना चणे, फुटाणे खाण्याची सवय लावावी. हे बल्य म्हणजे ताकत देणारे आहेत. हल्लीच्या भाषेत चांगले प्रोटीनचे सोर्स आहेत आणि कफ कमी करणारे आहेत. त्याबरोबर गूळ द्यावा म्हणजे चव वाढते, भूक भागते.

७) फुटाण्याचे डाळे, सुकं खोबरं, गूळ आणि तूप इतके साधे व घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून लाडू बनवून ठेवले व छोट्या सुट्टीतखाण्यासाठी किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून दिले तरी मुलं आवडीने खातील.

८) कधीतरी चवीत बदल म्हणून नागली, मूग किंवा उडीद पापड भाजून खायला द्यायला हरकत नाही, तळून नको.

९) सर्व प्रकारच्या लाह्या या ओलावा कमीकरणाऱ्या, कफ शोषक आहेत. त्यामुळे साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिरा लाह्या हिंग, हळद यांची फोडणी करून चिवडा स्वरूपात देता येतील.

१०) पॉपकॉर्न म्हणजेच मक्याच्या लाह्या देण्यासही हरकत नाही. पण साध्या फोडणीच्या असाव्यात,चीजवाल्या नकोत.

११) भाज्या शक्यतो कोरड्या परतलेल्या असाव्यात, रस्सा नको.

१३)  पालेभाज्या पावसाळ्यात चांगल्या मिळत नाहीत, लगेच सडतात. त्यांचा फार अट्टाहास धरू नये.

१४) फळभाज्या म्हणजे भेंडी, गिलकी, भोपळा, दोडका यांचा युक्तिपूर्वक मुलांच्या आहारात समावेश करावा.

१५) उसळी रुक्ष असल्याने कफ कमी करतात. परंतु वात दोष वाढवतात. त्यामुळे अधूनमधून देण्यास हरकत नाही.

१६) सवय लावली तर मुलं भाकरी आवडीने खातात. त्यांना गरम भाकरी लोणी किंवा तूप लावून द्यावी.

साधारण अशा प्रकारचा आहार पावसाळ्यात ठेवला तर फार आजारी न पडता लहान मुलांना चांगल्याप्रकारे आरोग्य टिकवता येईल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सParenting Tipsपालकत्वmonsoonमोसमी पाऊस