शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Health: भोपळी मिरचीची बात न्यारी, मोठ्या आजारांवर गुणकारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 5:47 PM

मला खाल्ल्याने अल्सर होतो ही चुकीची समजूत आहे. काही जण तर माझ्यामुळे मूळव्याध होतो असेही मानतात.

डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ) 

आरोग्यतारा स्पर्धेदरम्यान संत्रे आणि भोपळी मिरची यांचा मुकाबला होता. संत्र्याने आपली बाजू छान मांडली. प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही वाटत होते, 'आता बिचारी भोपळी मिरची काय करणार'. भोपळी मिरची स्टेजवर आली तेव्हा तिच्या वावरण्यात कुठेही भिती जाणवत नव्हती. तिने बोलायला चालू केले. तिने सुरुवात केली, परीक्षकांना नम्र विनंती आहे की मी अजिबात विनोदी बोलत नाही. कृपया माझ्या बोलण्यात कुठे विनोद वाटला तर एकदम जोरात हसू नका. पुढे ती म्हणाली, “आत्ताच संत्रेभाऊंनी त्यांच्यामुळे जे काही फायदे होतात हे सांगितले ते सर्व 'क' जीवनसत्वाची किमया आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्याकडे संत्रेभाऊंच्या तुलनेत तीन ते पाच पट जास्त  ‘क’ जीवनसत्व असते. माझ्यामधील 'क' जीवनसत्व अशा खुबीने साठवले जाते की त्यातील आंबटपणा झाकला जातो त्यामुळे आंबट ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी मी ‘क’ जीवनसत्वाचा उत्तम स्रोत असते. हे बोलणे चालू असताना तीनही परीक्षक आपापल्या फोनमधून गुगलसर्च देऊन हे सर्व खरे आहे का हे शोधत होते. 

भोपळी मिरची पुढे म्हणाली, दुसरा फायदा संत्रेभाऊंनी सांगितला तो म्हणजे त्यांच्याजवळील ‘अ’ जीवनसत्व वाढविणारी कॅरोटीन्स ही द्रव्य. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते. माझ्याकडे ही कॅरोटीन्सही भाऊंपेक्षा दोनपट जास्त उपलब्ध असतात. याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे कॅप्सिनॉईड्स नावाचे पदार्थ असतात. हे म्हणजे माझ्या चुलत बहिणीत जे कॅप्सिसीन आढळते तसे कॅप्सिनॉईड्स. कॅप्सिसीनमुळे तिखटपण येते. पोटात गेल्यानंतर कॅप्सिसीन जे काम करते ती सर्व कामे कॅप्सिनॉईड्स करतात. पोटात गेल्यानंतर, इथे पुढे ती काही बोलणार इतक्यात तिचे लक्ष परीक्षकांकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता आणि त्यांचे ठरलेले प्रश्न ओठांतून बाहेर पडायला उतावीळ होत होते. भोपळी मिरचीने ते बघून म्हटले, “आणि हो, मी लोकली ग्रो होते, माझी रसभाजी होते तशी पीठ पेरलेली पण भाजी होते. यांत पिठाऐवजी प्रोटीन वापरले तर माझी ‘हाय प्रोटीन, लो कार्ब, फायबरयुक्त, अँटीऑक्सिडंट्सने भरलेली भाजी बनते. हे ऐकून परीक्षक टाळ्या वाजवायला लागणार इतक्यात ती म्हणाली, “हे काहीच नाही, मला खाल्ल्याने, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांवर ही उत्तम उपाय होऊ शकतात. कधीकधी मी थोडी तिखट असते पण माझ्या चुलतबहीणींसमोर मी नगण्य आहे. माझा तिखटपणा हा एकपट तर त्यांचा माझ्या तुलनेत अनेक पट जास्त. मला खाल्याने लोकांना काही प्रमाणात कॅन्सरपासून बचाव करता येतो. 

मला खाल्ल्याने अल्सर होतो ही चुकीची समजूत आहे. काही जण तर माझ्यामुळे मूळव्याध होतो असेही मानतात ते पण चुकीचे आहे. अजून बोलायला भरपूर वेळ आणि भरपूर विषय होते पण इतक्यात संत्र उभे राहिले. त्याने पुढे येऊन मिरचीशी हस्तांदोलन केले. पुढे संत्रे म्हणाले, आज मी हरलो पण हरण्याचं दु:ख मोठं नाही, पण या मिरचीबाईंच्या गुणांची ओळख झाल्याचा आनंद त्यापेक्षा मोठा आहे. 

स्पर्धा अशी असावी. विजेता स्पर्धा जिंकत असताना हरणारा मने जिंकून जावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य