शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धोका ओळखा! पुढील महामारीचे कारण बुरशी ठरू शकते; संशोधनानंतर तज्ज्ञांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:05 IST

एकीकडे कोरोनाच्या तडाख्यातून जग सावरत असताना, गंभीर तसेच घातक बुरशीजन्य विषाणू संसर्गाचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा जगभरात धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनाच्या अनेक लाटा एकामागून एक धडकत असून, त्याचे परिणाम काही देशांमध्ये तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे. डेल्टा, ओमायक्रॉन, डेल्टाक्रॉन यांसारख्या अनेकविध व्हेरिएंटनंतर आता आणि नवा कोरोनाचा व्हेरिएंट समोर आला आहे. कोरोनाच्या महामारीपासून जग काही प्रमाणात सावरत असताना तज्ज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. पृथ्वीवरील पुढील महामारीचे कारण बुरशी ठरू शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. 

कोरोनामुळे वन्यजीवांमधील किंवा वन्यजीवांपासून मानवाला धोका निर्माण होणाऱ्या विषाणूंबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरूकता निर्माण करण्यात आली असली तरी बुरशीसारख्या सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजार, धोके यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. किंबहुना ते करून चालणार नाही, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. सन २०२१ च्या मध्यात कोरोनाची गंभीर प्रकरणे असलेल्या आणि व्हायरसपासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर बुरशीजन्य संसर्गाचा अहवाल समोर आला. रुग्णांना एस्परगिलोसिस नावाच्या साच्यापासून श्वसन संक्रमणाचे निदान झाले. विशेषतः भारतात एक गंभीर परंतु दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग म्युकरमायकोसिस आढळून आला होता. याचे गंभीर परिणाम दिसून आले असून, परिणामी मृत्यूही ओढावू शकतो.

अमेरिकेतही बुरशीमुळे गंभीर आजार

कोरोनाचा अमेरिकेत धुमाकूळ सुरू आहे. तसेच दक्षिण-पश्चिम अमेरिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे बुरशी संसर्गामुळे ताप येण्याचे प्रकार समोर आले आहेत. बुरशीचा संसर्ग हा बहुतांश प्रमाणात दुषित मातीमुळे होत असल्याचे समोर आल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. प्रदुषण, वातावरणीय बदल आणि भौगोलिक परिस्थिती यामुळे बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गात वाढ होत चालल्याचे सांगितले जात आहे. बुरशीजन्य विषाणू असलेल्या मातीच्या धुळीमुळे श्वास घेतल्यानंतर ताप येतो. हवामान बदलामुळे वारंवार दुष्काळ पडतो, ज्यामुळे अधिक धूळ निर्माण होते आणि भूकंपामुळे इमारतींच्या बांधकामामुळे धूळ अधिक प्रमाणात पसरते. एकत्रितपणे, या घटकांमुळे बुरशीजन्य संसर्गामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

कँडिडा ऑरिसचा नवा धोका

कँडिडा ऑरिस हा एक आक्रमक विषाणूचा प्रकार असून, याच्या संसर्गामुळे परिणामी मृत्यूही होऊ शकतो. हा नवीन साथीच्या रोगाचा सर्वांत मोठा धोका आहे. मानवामुळे हवामान बदलातून उद्भवलेल्या नवीन प्राणघातक रोगजनकाचे हे पहिले उदाहरण असू शकते. कारण ते तीन खंडांवर एकाच वेळी दिसले असून, केवळ मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय बदलाद्वारे होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सन २००९ मध्ये प्रथम हा संसर्गजन्य विषाणू आढळून आला होता. कँडिडा ऑरिसचा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला थेट संसर्ग होण्याचा पुरावा नाही. परंतु वातावरणात, पृष्ठभागांवर आणि दैनंदिन वस्तूंवर हा विषाणू टिकून राहतो. तसेच हा विषाणू वेगाने पसरतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महामारीविज्ञान आणि हवामान डेटाची उपलब्धता आणि लोकसंख्येच्या सामाजिक असुरक्षा समजून घेणे, यामुळे सार्वजनिक जागरूकता वाढविण्यात आणि जोखीम असलेल्या गटांना लक्ष्य करण्यात मदत झाली आहे. प्राण्यांची संख्या, लोकसंख्या आणि पर्यावरणीय बदलाचे एकात्मिक निरीक्षण करणे आणि सार्वजनिक स्तरावरील आरोग्याचे शिक्षण बुरशीजन्य रोगांपासून दूर राहण्यास मदत करू शकते, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्य