शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

धोका ओळखा! पुढील महामारीचे कारण बुरशी ठरू शकते; संशोधनानंतर तज्ज्ञांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:05 IST

एकीकडे कोरोनाच्या तडाख्यातून जग सावरत असताना, गंभीर तसेच घातक बुरशीजन्य विषाणू संसर्गाचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा जगभरात धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनाच्या अनेक लाटा एकामागून एक धडकत असून, त्याचे परिणाम काही देशांमध्ये तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे. डेल्टा, ओमायक्रॉन, डेल्टाक्रॉन यांसारख्या अनेकविध व्हेरिएंटनंतर आता आणि नवा कोरोनाचा व्हेरिएंट समोर आला आहे. कोरोनाच्या महामारीपासून जग काही प्रमाणात सावरत असताना तज्ज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. पृथ्वीवरील पुढील महामारीचे कारण बुरशी ठरू शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. 

कोरोनामुळे वन्यजीवांमधील किंवा वन्यजीवांपासून मानवाला धोका निर्माण होणाऱ्या विषाणूंबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरूकता निर्माण करण्यात आली असली तरी बुरशीसारख्या सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजार, धोके यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. किंबहुना ते करून चालणार नाही, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. सन २०२१ च्या मध्यात कोरोनाची गंभीर प्रकरणे असलेल्या आणि व्हायरसपासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर बुरशीजन्य संसर्गाचा अहवाल समोर आला. रुग्णांना एस्परगिलोसिस नावाच्या साच्यापासून श्वसन संक्रमणाचे निदान झाले. विशेषतः भारतात एक गंभीर परंतु दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग म्युकरमायकोसिस आढळून आला होता. याचे गंभीर परिणाम दिसून आले असून, परिणामी मृत्यूही ओढावू शकतो.

अमेरिकेतही बुरशीमुळे गंभीर आजार

कोरोनाचा अमेरिकेत धुमाकूळ सुरू आहे. तसेच दक्षिण-पश्चिम अमेरिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे बुरशी संसर्गामुळे ताप येण्याचे प्रकार समोर आले आहेत. बुरशीचा संसर्ग हा बहुतांश प्रमाणात दुषित मातीमुळे होत असल्याचे समोर आल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. प्रदुषण, वातावरणीय बदल आणि भौगोलिक परिस्थिती यामुळे बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गात वाढ होत चालल्याचे सांगितले जात आहे. बुरशीजन्य विषाणू असलेल्या मातीच्या धुळीमुळे श्वास घेतल्यानंतर ताप येतो. हवामान बदलामुळे वारंवार दुष्काळ पडतो, ज्यामुळे अधिक धूळ निर्माण होते आणि भूकंपामुळे इमारतींच्या बांधकामामुळे धूळ अधिक प्रमाणात पसरते. एकत्रितपणे, या घटकांमुळे बुरशीजन्य संसर्गामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

कँडिडा ऑरिसचा नवा धोका

कँडिडा ऑरिस हा एक आक्रमक विषाणूचा प्रकार असून, याच्या संसर्गामुळे परिणामी मृत्यूही होऊ शकतो. हा नवीन साथीच्या रोगाचा सर्वांत मोठा धोका आहे. मानवामुळे हवामान बदलातून उद्भवलेल्या नवीन प्राणघातक रोगजनकाचे हे पहिले उदाहरण असू शकते. कारण ते तीन खंडांवर एकाच वेळी दिसले असून, केवळ मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय बदलाद्वारे होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सन २००९ मध्ये प्रथम हा संसर्गजन्य विषाणू आढळून आला होता. कँडिडा ऑरिसचा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला थेट संसर्ग होण्याचा पुरावा नाही. परंतु वातावरणात, पृष्ठभागांवर आणि दैनंदिन वस्तूंवर हा विषाणू टिकून राहतो. तसेच हा विषाणू वेगाने पसरतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महामारीविज्ञान आणि हवामान डेटाची उपलब्धता आणि लोकसंख्येच्या सामाजिक असुरक्षा समजून घेणे, यामुळे सार्वजनिक जागरूकता वाढविण्यात आणि जोखीम असलेल्या गटांना लक्ष्य करण्यात मदत झाली आहे. प्राण्यांची संख्या, लोकसंख्या आणि पर्यावरणीय बदलाचे एकात्मिक निरीक्षण करणे आणि सार्वजनिक स्तरावरील आरोग्याचे शिक्षण बुरशीजन्य रोगांपासून दूर राहण्यास मदत करू शकते, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्य