शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘भाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी’; जाणून घ्या आयुर्वेदशास्त्रानुसार 'या' भाज्यांचे गुणधर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:04 IST

‘हिरवा भाजीपाला खावा रोज, राहील निरोगी आरोग्याची मौज’, ‘भाजीपाल्याचे महत्त्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्त्व...’

डॉ. अंकुश जाधवजागतिक महासाथ असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. कोरोना व त्यात आता पावसाळा. पावसाळ्यात सूर्यकिरणं प्रखर नसल्याने रोग होण्याची शक्यता अधिक असते. भूक न लागणे, सर्दी, पडसे, खोकला, ताप, आम्लपित्त, जुलाब होणे, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार या काळात अधिक होतात. पावसाळ्यात मोजके आणि कमी खावे. पचायला हलका आहार घ्यावा. खाण्याचे पदार्थ स्वच्छ, ताजे व गरम असावेत. आहारात मिरी, सुंठ, आले, हिंग, कांदा, लसूण यासारख्या पदार्थांचा वापर अधिक करावा. फळभाज्या का खाव्यात, त्याचे उत्तर सुरुवातीच्या म्हणीत आहे. पावसाळ्यात कोणत्या फळ व पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते, ते येथे सांगितले आहे.आपण जो दररोज आहार घेत असतो, त्या आहारातूनच आपल्या शरीरास आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळत असतात. त्यातून आपली रोगप्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टीम) मजबूत होते. आजच्या विज्ञानानुसार रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी प्रथिनांची (प्रोटिन्स) आवश्यकता असते. मानवी शरीरासाठी दैनंदिन आहारातून प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. शरीर प्रथिने साठवून ठेवत नाही. त्यामुळे ते दररोज घ्यावे लागतात. या सर्व भाज्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे कार्य करतात.

आयुर्वेदशास्त्रानुसार या भाज्यांचे गुणधर्म

  • मेथी : वात व कफ दोषनाशक आहे. भुकेची इच्छा न होणे, मधुमेह, आमवात, ताप, स्थौल्य, सूज, वारंवार जुलाब होणे यात मेथीचा उपयोग होतो. मेथी मातेचे दूध वाढविणारी आहे. मेथीचे लाडू बाळंतपणानंतर खावेत.
  • माठ : हिचे पांढरा, तांबडा व काटेरी असे तीन प्रकार असून चवीला तुरट आहे. माठ रक्तशुद्धीकर आहे. हिचा पित्तरोग रक्त व त्वचारोग, चक्कर येणे यांत चांगला उपयोग होतो.
  • वांगे : वांग्याविषयी बराच मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे वातुळ आहे. वास्तविक वांग्याने वातदोष वाढत नसून उलट दोषांचे शमन करते. पांढरे वांगे मूळव्याधनाशक आहे.
  • पालक : ही थोडी पचायला जड असली, तरी मलप्रवृत्ती साफ करणारी आहे. नेहमी खाण्यास योग्य आहे. रक्त वाढविणारी भाजी म्हणून प्रसिद्ध आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
  • चाकवत : ही वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे शमन करते. ही मूळव्याध, त्वचारोग, पोटाचे विकार यासाठी चांगली असून रक्त वाढविणारी आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
  • तांबडा भोपळा : शरीर बारीक असणे, लघवी साफ न होणे, सर्वांगाची आग होणे, त्वचाविकार यात उपयोगी ठरते. ज्यांना जाड व्हायचे आहे, त्यांनी दोन्ही भोपळ्यांच्या भाज्या खाव्यात.
  • कांदा : सुका खोकला, रक्तपित्त, हृदय अशक्त असणे, लघवीला अडखळत होणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, संभोगाची इच्छा कमी होणे, मासिकपाळीच्या वेळी पोटात दुखणे, संधिवात, कावीळ, सूज, मूळव्याध इ. अनेक आजारांत कांद्याचा उपयोग होतो. जखमेवर याचा लेप करतात. जखम बरी होण्यास मदत होते. मुकामार लागून येणाऱ्या सुजेवर लेप करतात. फिट आली तर कांदा फोडून नाकाजवळ धरतात.
  • पडवळ : पचायला हलका, चवीला काहीसा कडू असून तिन्ही दोषकारक आहे. अजीर्ण, वारंवार तहान लागणे, पोटात जंत होणे, सूज येणे, अशक्तपणा यावर उपयोगी ठरतो. याने शौचास साफ होण्यास मदत होते.
  • तोंडली : पचायला हलकी व दोषशामक आहे. हिचा जखमेवर लेप केल्यास सूज व वेदना कमी होतात. यकृतविकार, कावीळ, रक्तविकार, खोकला, दमा, मधुमेह या आजारांवर उपयोगी ठरते. परंतु, नेहमी खाऊ नये.
  • दोडका : गाठी होणे, रक्त व त्वचारोग, प्लीहा व यकृत या अवयवांना सूज येणे, खोकला व दमा या आजारांवर उपयोगी.
  • मुळा : कोवळा मुळा पचायला हलका असतो. मूतखडा असलेल्यांनी कोवळा मुळा अवश्य खावा. मासिकपाळीच्या वेळी योग्य प्रमाणात स्राव न होणे, यासाठी उपयोगी आहे. भाज्या फार बारीक चिरू नयेत.
  • कारले : पचायला हलके, चवीला कडू असून तिन्ही दोषांचे शमन करणारे आहे. हे जखमांची शुद्धी करणारे व जखमा भरून येण्यास मदत करणारे आहे. याचा यकृतविकार, स्वादुपिंडाचे आजार, आमदोष, मूळव्याध, त्वचाविकार, स्थौल्य, विषबाधा इ. आजारांवर उपयोगी. योन, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणून, मधुमेही रुग्णांत विशेष उपयोगी.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या