या हिरव्या पालेभाज्या खा, कोरोनानंतरचा थकवा, ताण दूर करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:25 IST2021-05-27T16:20:50+5:302021-05-27T16:25:21+5:30
हिरव्या भाज्या या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. यात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. कोरोनानंतरचा थकवा, ताण घालवण्यासाठी यांचा आहारात समावेश करा...

या हिरव्या पालेभाज्या खा, कोरोनानंतरचा थकवा, ताण दूर करा...
कोरना झाल्यानंतर अनेकजण कमजोरी, थकवा आणि मानसिक तणावाची तक्रार करतात. कोरोनानंतर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झालेली असते. ही कमतरता भरुन करण्यासाठी निरोगी आणि संतुलित आहार घेणे खूप आवश्यक आहे. हिरव्या भाज्या या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. यात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.
पालक
पालक भाजीमध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, ई, के, कॅल्शियम, लोह आणि बीटा कॅरोटीनोईड सारख्या उत्कृष्ट पोषक तत्वे असतात. त्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चांगली चालना मिळते हिरव्या पालेभाज्या, लोह, फोलेट, ल्युटिन आणि ओमेगा -3 मुबलक असल्यामुळे पालकचे सेवन केल्यास स्नायु बळकट होतात आणि ऊर्जेची कमतरता भरुन निघते. तुम्ही पालक कच्चा खाऊ शकता किंवा भाजी बनवून खाऊ शकता.
आले
आल्याचा अँटीस्पास्मोडिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल फायद्यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध, आले तणाव कमी करण्यास मदत करते आणि संसर्गजन्य रोगांना दूर ठेवते. तुम्ही एकतर कच्चे आले खाऊ शकता किंवा चहा अथवा भाजीत घालून खाऊ शकता.
ब्रोकोली
ब्रोकोली पोषक तत्वांनी समृद्ध अशी भाजी आहे. यात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लूटाथिओन समृद्ध हे रोगप्रतिकारक शक्तीस मदत करते आणि शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आपण ब्रोकोलीचे सूप बनवूनही खाऊ शकता.
बेल पेपर
रंगीत बेल पेपरमध्ये लिंबूवर्गीय फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे ते आरोग्य उत्तम ठेवतात. कुरकुरीत बेल मिरचीमध्ये कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, म्हणून जलद रिकव्हरीसाठी हे आपल्या आहारात समाविष्ट करा.
सोया
सोया प्लांट-आधारीत प्रथिने, इम्युनो-मॉड्युलेटरी आइसोफ्लेव्हन्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्ससह समृद्ध असतात. त्यामुळे आतड्याचे कार्य सुधारते. सोया आणि सोयापासून पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारून हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.