डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे 3 सोपे उपाय, असह्य वेदना होतील दूर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:29 IST2025-05-30T16:28:20+5:302025-05-30T16:29:18+5:30
Kidney Stone: तुम्हालाही किडनी स्टोन असेल तर एक्सपर्टनी ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

डॉक्टरांनी सांगितले किडनी स्टोनपासून बचावाचे 3 सोपे उपाय, असह्य वेदना होतील दूर...
Kidney Stone: किडनी स्टोनची समस्या आजकाल भरपूर लोकांना होत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आनुवांशिकता इतरही अनेक कारणांनी किडनी स्टोनची समस्या होते. किडनीमध्ये स्टोन झाल्यावर असह्य अशा वेदना होतात. स्टोनचा आकार लहान असेल तर ठीक, पण जर मोठा असेल तर त्याला सहजपणे काढणंही अवघड असतं. अशात सर्जरी देखील करावी लागते. तुम्हालाही किडनी स्टोन असेल तर एक्सपर्टनी ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.
एम्समध्ये काम केलेल्या डीएम न्यूरोलॉजी डॉ. प्रियंका सेहरावत यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी सांगितलं की, 'किडनीमध्ये स्टोन होण्याचं मुख्य कारण लघवीमध्ये कॅल्शिअम आणि ऑक्सलेटचं अधिक प्रमाण असतं. जेव्हा हे दोन्ही तत्व एकत्र येतात, तेव्हा क्रिस्टलच्या रूपात काम करतात. नंतर ते स्टोनचा आकार घेतात. अशात तुम्ही जर तुमच्या लाइफस्टाईलमध्ये 3 बदल केले तर किडनी स्टोनपासून तुमचा बचाव होऊ शकते किंवा आधीच असलेली समस्या दूर होते'.
मीठ कमी खा
डॉक्टर सेहरावत यांनी सांगितलं की, मिठामुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं. जेव्हा कॅल्शिअम जास्त होतं, तेव्हा ते ऑक्सलेटसोबत मिळून स्टोन तयार करतं. अनेक शोधातून समोर आलं आहे की, दिवसभरात मिठाचं प्रमाण 5 ग्रॅम इतकंच असावं. तरच किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
याशिवाय डॉक्टर सायट्रिक अॅसिड असलेली फळं खाण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांनुसार, सायट्रिक अॅसिड लघवीमध्ये स्टोन तयार न होऊ देणारे तत्व वाढवतं. तसेच आधीच असलेले स्टोन तोडण्यासही मदत करतं.
ऑक्सलेट टाळा
किडनीमध्ये स्टोन होण्यासाठी ऑक्सलेट सगळ्यात जास्त कारणीभूत असतं. त्यामुळे ऑक्सालेट असलेल्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. पालक, बीट, रताळे यात ऑक्सालेट भरपूर असतं.
भरपूर पाणी प्या
वरील गोष्टींशिवाय किडनीमध्ये स्टोन झाला असेल तर पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टरांनुसार, दिवसभरातून किमान 2.5 लीटर पाणी प्यायला हवं. जेणेकून लघवी पातळ राहील आणि विषारी तत्व बाहेर पडतील. पाणी भरपूर प्याल तर छोटे स्टोन सहजपणे बाहेर पडू शकतात.