शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

सफरचंदाच्या बिया म्हणजे विषच! पोटात जाताच होऊ शकतो मृत्यू, सफरचंद खाताना राहा सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 17:14 IST

तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण जात असलं तरी, सफरचंदाच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.

सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु त्याच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे तुम्हाला सांगितले तर, तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण जात असलं तरी, सफरचंदाच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.

सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन नावाची वनस्पती संयुग असते, जे विषारी असू शकते. जेव्हा हा घटक पाचक एन्झाईम्सच्या संपर्कात येतो तेव्हा ते सायनाइड सोडू लागते. तज्ञांच्या मते, ते इतके हानिकारक असू शकते की, ते खाल्ल्याने तुमचा जीवही जाऊ शकतो. परंतु हे लक्षात घ्या की, तुम्ही चुकून फक्त एक किंवा दोन बिया गिळल्यास, काळजी करु नका ते तुमच्या जिवनासाठी हानिकारक ठरणार नाही, परंतु यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

मेडिकल न्यूज टुडे हेल्थ वेबसाइटनुसार, सफरचंदाच्या बियांचे कमी प्रमाणात सेवन केल्याने चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि अशक्तपणा येऊ शकतो. सफरचंदाच्या बियांमध्ये असलेले वनस्पती संयुग अमिग्डालिनमध्ये सायनाइड आणि साखर असते. शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे हायड्रोजन सायनाइडमध्ये रूपांतर होते. यातून तुम्ही आजारी तर पडू शकताच पण मृत्यूचाही धोका आहे.

त्याच्या रासायनिक स्वरूपाव्यतिरिक्त, काही फळांच्या बियांमध्ये सायनाइड आढळते. यामध्ये जर्दाळू, चेरी, पीच, प्लम आणि सफरचंद या फळांचा समावेश आहे. या बियांमध्ये एक अतिशय मजबूत लेप असतो जो अमिग्डालिनला आत ठेवतो.

सायनाइडमुळे हृदय आणि मेंदूचे नुकसान होते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, एखादी व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. सायनाईडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

सफरचंदाच्या बियांच्या विषारी प्रभावामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे तुम्ही बेहोशही होऊ शकता. सफरचंदाच्या बिया खाल्ल्यानंतर तुम्ही बरे झालात तरीही त्याचा तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो आणि त्यामुळे हृदय आणि मेंदूला खूप नुकसान होते.

सफरचंदाचे दाणे बहुतेक लोक खात नाहीत, पण अनेकवेळा चुकून तोंडात आले तर चघळू नका, गिळू नका, लगेच फेकून द्या. मात्र, या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यासच तुमचे नुकसान होते. Amygdalin हा बियाण्यांच्या रासायनिक संरक्षणाचा एक भाग आहे आणि बियाणे पूर्ण असल्यास आणि चघळले नसल्यास ते नुकसान करत नाही.

सायनाइड विषबाधामुळे, तुम्हाला चिंता, डोकेदुखी, चक्कर येणे आणि गोंधळ यासारखी लक्षणे जाणवतील. सफरचंदाच्या बिया प्रमाणात खाल्ल्याने तुमचे किती नुकसान होईल, ते तुमच्या शरीराच्या वजनावरही अवलंबून असते. काही लोकांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. त्याच वेळी, काही लोकांसाठी ते घातक देखील असू शकते.

सफरचंदाच्या बिया कमी प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होत नाही, परंतु जर ते रस किंवा संपूर्ण फळ मोठ्या प्रमाणात घेतल्यास नुकसान होते. २०१५ च्या पुनरावलोकनानुसार, सफरचंदाच्या १ ग्रॅम बियांमध्ये अमिग्डालिन सामग्रीचे प्रमाण १ ते ४ मिलीग्राम मिग्रॅ पर्यंत असू शकते. हे सफरचंदाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते. तथापि, त्याच्या बियाण्यांमधून सायनाइड सोडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की, सफरचंदाचा रस बनवतानाही त्याच्या बिया काढून टाकल्या पाहिजेत कारण त्यात ऍमिग्डालिनचे प्रमाण जास्त असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स