शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंदाच्या बिया म्हणजे विषच! पोटात जाताच होऊ शकतो मृत्यू, सफरचंद खाताना राहा सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 17:14 IST

तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण जात असलं तरी, सफरचंदाच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.

सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु त्याच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे तुम्हाला सांगितले तर, तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण जात असलं तरी, सफरचंदाच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात.

सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन नावाची वनस्पती संयुग असते, जे विषारी असू शकते. जेव्हा हा घटक पाचक एन्झाईम्सच्या संपर्कात येतो तेव्हा ते सायनाइड सोडू लागते. तज्ञांच्या मते, ते इतके हानिकारक असू शकते की, ते खाल्ल्याने तुमचा जीवही जाऊ शकतो. परंतु हे लक्षात घ्या की, तुम्ही चुकून फक्त एक किंवा दोन बिया गिळल्यास, काळजी करु नका ते तुमच्या जिवनासाठी हानिकारक ठरणार नाही, परंतु यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

मेडिकल न्यूज टुडे हेल्थ वेबसाइटनुसार, सफरचंदाच्या बियांचे कमी प्रमाणात सेवन केल्याने चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि अशक्तपणा येऊ शकतो. सफरचंदाच्या बियांमध्ये असलेले वनस्पती संयुग अमिग्डालिनमध्ये सायनाइड आणि साखर असते. शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे हायड्रोजन सायनाइडमध्ये रूपांतर होते. यातून तुम्ही आजारी तर पडू शकताच पण मृत्यूचाही धोका आहे.

त्याच्या रासायनिक स्वरूपाव्यतिरिक्त, काही फळांच्या बियांमध्ये सायनाइड आढळते. यामध्ये जर्दाळू, चेरी, पीच, प्लम आणि सफरचंद या फळांचा समावेश आहे. या बियांमध्ये एक अतिशय मजबूत लेप असतो जो अमिग्डालिनला आत ठेवतो.

सायनाइडमुळे हृदय आणि मेंदूचे नुकसान होते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, एखादी व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. सायनाईडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

सफरचंदाच्या बियांच्या विषारी प्रभावामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे तुम्ही बेहोशही होऊ शकता. सफरचंदाच्या बिया खाल्ल्यानंतर तुम्ही बरे झालात तरीही त्याचा तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो आणि त्यामुळे हृदय आणि मेंदूला खूप नुकसान होते.

सफरचंदाचे दाणे बहुतेक लोक खात नाहीत, पण अनेकवेळा चुकून तोंडात आले तर चघळू नका, गिळू नका, लगेच फेकून द्या. मात्र, या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यासच तुमचे नुकसान होते. Amygdalin हा बियाण्यांच्या रासायनिक संरक्षणाचा एक भाग आहे आणि बियाणे पूर्ण असल्यास आणि चघळले नसल्यास ते नुकसान करत नाही.

सायनाइड विषबाधामुळे, तुम्हाला चिंता, डोकेदुखी, चक्कर येणे आणि गोंधळ यासारखी लक्षणे जाणवतील. सफरचंदाच्या बिया प्रमाणात खाल्ल्याने तुमचे किती नुकसान होईल, ते तुमच्या शरीराच्या वजनावरही अवलंबून असते. काही लोकांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. त्याच वेळी, काही लोकांसाठी ते घातक देखील असू शकते.

सफरचंदाच्या बिया कमी प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होत नाही, परंतु जर ते रस किंवा संपूर्ण फळ मोठ्या प्रमाणात घेतल्यास नुकसान होते. २०१५ च्या पुनरावलोकनानुसार, सफरचंदाच्या १ ग्रॅम बियांमध्ये अमिग्डालिन सामग्रीचे प्रमाण १ ते ४ मिलीग्राम मिग्रॅ पर्यंत असू शकते. हे सफरचंदाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते. तथापि, त्याच्या बियाण्यांमधून सायनाइड सोडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की, सफरचंदाचा रस बनवतानाही त्याच्या बिया काढून टाकल्या पाहिजेत कारण त्यात ऍमिग्डालिनचे प्रमाण जास्त असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स