शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे? जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 3:45 PM

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

(Image Credit : livelyeaters.com.au)

डॉ. आरती सोमण, आयुर्वेदिक विशेषज्ञ, निसर्ग हर्ब्स

पालक आपल्या मुलांच्या बाबतीत सतत कोणती ना कोणती चिंता करत असतात. १-५ वर्षे वयोगटातील मुलांचे बरेचसे पालक हे मुलांची भूक कमी झाल्याची किंवा त्यांना खाण्याच्या चुकीच्या सवयी असल्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातात. बाळाचे पहिल्या वर्षातील वजन ६-७ किलोग्रॅमपर्यंत वाढणे आणि त्यानंतर पाचव्या वर्षापर्यंत २ ते ३ किलोग्रॅम्सनी वाढणे पालकांसाठी सवयीचे असते. पण या वयोगटातील मुलांचे वजन कधी कधी तीन-चार महिन्यांत थोडेही वाढत नाही. त्यांची वाढ वेगाने होत नाही. त्यामुळे खाणे मागण्याचे प्रमाण कमी होते व परिणामी मुले कमी खाऊ लागतात किंवा अजिबातच खात नाहीत. या समस्येला फिजिओलॉजिकल अ‍ॅनारॉक्सिया असे म्हणतात. 

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

अनेक पालक दिवसभर आपल्या मुलांच्या पोटात मधल्या वेळचे खाणे, फळे किंवा इतर पदार्थ ढकलत राहतात. पण मूल मागेल तेव्हाच त्याला खाऊ देणे योग्य आहे कारण शरीराला अन्नाची गरज आहे हे जाणवताच त्याची मागणी करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मुलांकडे उपजतच असते. पुरेशी भूक लागत नसल्याने आपल्या मुलांमध्ये जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता निर्माण होईल अशी चिंताही अनेक पालकांना भेडसावत असते. पण मुलांना जबरदस्ती खायला घातल्यानेही मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो व जेवणाची वेळ त्यांना शिक्षेसारखी वाटू शकते. 

एकदा का तुमचे मूल चमच्याचा वापर करण्याइतके मोठे झाले की पालक म्हणून तुम्ही ते काम पुन्हा कधीही हातात घेऊ नका. तुमच्या मुलांना भूक लागली तर ती स्वत: मागून घेतील. आपल्या मुलांची वजन, उंची नीट वाढतेय ना याची चिंता सोडून द्या. कारण लहान चणीच्या काही मुलांना अन्नाची गरजही तुलनेने कमी असते. 

पण तुमचे मूल वयाने मोठे असेल व त्याची भूक लक्षात येण्याजोग्या प्रमाणात मंदावली असेल, ते सतत थकलेली व चिडचिडी दिसत असतील तर मात्र सावध व्हायला हवे. मुलांच्या खाण्याच्या सवयींत असा बदल होत असेल तर पोटाचा फ्लु, ताप, घसा खबखवणे आणि अतिसार हे आजार त्याला कारणीभूत असू शकतात.  

कौटुंबिक समस्यांमुळे येणारा ताण किंवा अभ्यासात मागे पडणे. 

नैराश्य -  नैराश्यामुळे मुलांच्या भुकेवर खूप परिणाम होतो. 

अ‍ॅनोरेक्सिया नर्व्होसा – मनापासून अन्न खाणे टाळावेसे वाटणे. 

अ‍ॅनिमिया – अ‍ॅनिमिया असलेली मुले आळशी, थकलेली आणि चिडचिडी असतात. 

पोटात कृमी होणे – कृमींमुळे मुलांची भूक कमी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव, अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.  

बद्धकोष्‍ठता – कोठा नियमितपणे साफ न झाल्यास मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो. 

आपल्या मुलांची भूक वाढविण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. पण काहीवेळा आपल्या मुलांनी खायला हवे तितके खावे यासाठी भूक वाढविणारी औषधे देण्याची गरज भासते. अशाप्रकारचे पुरक औषध निवडताना ते उत्पादन अस्सल आणि पुरेशा संशोधनातून सिद्ध झालेले असेल याची काळजी घ्यायला हवी. 

वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवून आणि सखोल संशोधनातून काही अशा वनौषधी शोधल्या गेल्या आहेत, ज्या सर्वाधिक परिणामकारकतेने मुलांची भूक वाढवू शकण्याच्या कामी समरस होऊ शकतात. या वनौषधी म्हणजे चांगली भूक लागण्यास मदत करणारे तसेच त्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे सर्वोत्तम पर्याय आहेत. निसर्ग हर्ब्जमध्ये आम्ही 'इम्युटायझर' सिरप तयार केला आहे, जे संपूर्णपणे शुद्ध वनौषधींपासून बनविलेले पुरक औषध आहे. लहान मुलांसाठी ते अत्यंत सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

घसा खवखवल्यास कोरोनाची भीती न ठेवता; 'हे' घरगुती उपाय वापरून झटपट मिळवा आराम

संशोधकांनी टिपले कोरोना विषाणूबाधित पेशींचे छायाचित्र

coronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य