शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तेढवा-शिवणी योजनेचे पाणी पोहचले बांधापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे तयार करुन तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचनाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देरोवणीसाठी मदत : पाऊस लांबल्याने समस्या, प्रकल्पावर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपला तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे रोवणी खोळंबल्या असून केलेली रोवणी सुध्दा आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. रोवणीसाठी गोंदिया तालुक्यातील तेढवा-शिवणी, रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना आणि इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले.हे पाणी गुरूवारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे तयार करुन तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचनाची सोय करण्यात आली. नदीपात्रात असलेला गाढ, अनियमित विद्युत पुरवठा, प्रकल्पात असणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यास अडचण निर्माण होत होती.यासंबंधी शेतकऱ्यांनी आ. विनोद अग्रवाल यांना निवेदन दिले होते. विदर्भ पाटबंधारे विभाग गोंदियाच्या अधिकाºयांशी संपर्कसाधून दोन्ही प्रकल्पांना कार्यान्वीत करण्यात आले. त्यावर प्रकल्प अभियंता, शाखा अभियंता व इतर पदाधिकारी यांनी पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर केल्या. अखेर प्रकल्प सुरू झाला. मात्र काही तासातच पुन्हा विद्युत पुरवठ्यामध्ये अनियमितता असल्याने तसेच कमी दाबाचे विद्युत पुरवठा असल्याने मोटार वारंवार बंद पडत होते. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला.त्यानंतर व्होल्टेज दाब वाढवून प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नदीतील गाळ, तांत्रिक अडचणी, विद्युत पुरवठा असल्या विविध समस्यांना सामोरे जात अखेर दोन्ही प्रकल्पात सातत्य आले असून शेतकऱ्यांच्या बांधवांवर पाणी पोचले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण