शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करा

By admin | Updated: March 17, 2016 02:29 IST

माणसाला सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीचे महत्व नसते. पाणी हे सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याचेसुध्दा महत्व माहीत नाही.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : विविध कार्यक्रमांनी जलजागृती सप्ताहाला सुरूवातगोंदिया : माणसाला सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीचे महत्व नसते. पाणी हे सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याचेसुध्दा महत्व माहीत नाही. भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने न केल्यास भीषण जलसंकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, असा सल्लावजा इशारा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिला.तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या वैनगंगा नदी काठावरील कवलेवाडा बॅरेज येथे बुधवारी जलजागृती सप्ताहाचे जलपूजन करु न उद्घाटन केल्यानंतर डॉ.सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार भजनदास वैद्य, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, पंचायत समितीच्या सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ. किशोर पारधी, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, राजलक्ष्मी तुरकर, कैलास पटले, मिना बिसेन, सुनीता मडावी, प्रिती रामटेके, रजनी कुंभरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण मेश्राम, मनोहर राऊत, नीता रहांगडाले, माया शरणागत, डॉ.रहांगडाले, पवन पटले, कवलेवाडाच्या सरपंच श्रीमती पारधी, कार्यकारी अभियंता यासतवार, नरेंद्र ढोरे, निखारे, गेडाम, छप्परघरे, उपविभागीय अधिकारी महिरे तहसीलदार चव्हाण, नायब तहसीलदार कोकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, यावर्षीच्या जलदिनाची संकल्पना पाणी आणि नोकरी यावर आधारीत आहे. जगातील १५० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही पाण्याशी संबंधित व्यवसायाशी निगडित आहे. जिल्ह्यात सिंचनातून कृषी क्रांती घडविण्याची क्षमता धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. ही सिंचन क्षमता पूर्ण होताच जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा लक्षात घेता नगदी पिकाकडे वळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे बीलसुध्दा वेळेत भरले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविकातून अ.अभियंता नार्वेकर म्हणाले, राज्यातील काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाण्याची बचत करणे काळाची गरज झाली आहे. शेती, घरी आणि व्यवयायासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. ेप्रत्येकाने जलजागृती सप्ताहात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन त्यांनी केले. कार्यक्र माला विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच कवलेवाडा परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी मनोज दाढी व त्यांच्या कलावंतांनी जलजागृतीपर पथनाट्य सादर करु न जलसाक्षरतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन दुलीचंद बुध्दे यांनी तर आभार विलास पाटील यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)पाटबंधारे विभागाची रॅलीजलजागृती सप्ताहांतर्गत दि.१६ ला दुपारी १२ वाजता सुभाष गार्डनसमोरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. यात मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया, बाघ इडियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया व गोंदिया पाटबंधारे विभाग तसेच लघुसिंचन (जलसंधारण) विभागातील तथा जिल्ह्यातील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. दुपारी २ वाजता या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप करण्यात आला. त्यांना कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम यांनी जलप्रतिज्ञा देऊन पाण्याचे महत्व सांगितले.जिल्हा परिषदेत जलपूजन जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी.गावडे यांच्या हस्ते जलपूजन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, सभापती देवराज वडगाये, सभापती विमल नागपुरे, ज्येष्ठ जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पाण्याचा योग्य वापर न केल्यास पुढील पिढीला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, असे यावेळी राजलक्ष्मी तुरकर म्हणाल्या.