शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

धान बुडविणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा

By admin | Updated: October 5, 2015 01:59 IST

धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा,

खासदारांची मागणी : मुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्र्यांकडे कैफियतगोंदिया : धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याचे खासदार तथा भाजपाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. गोंदियात शनिवारी रात्री ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.देवरी, आमगावमधील कार्यक्रम आटोपून गोंदियात आले असताना खा.नेते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आदिवासी विकास महामंडळाने राईस मिलर्सना धान भरडाई करण्यासाठी देताना तेवढ्या धानाची अनामत रक्कम भरून घेणे गरजेचे आहे. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने मिलर्सकडून कोणतीही अनामत रक्कम न घेता त्यांना ४०० ते ५०० कोटी रुपयांचा धान भरडाईसाठी दिल्याचे खा.नेते म्हणाले. राईस मिलर्सने अजूनपर्यंत तो धान भरडाई करून दिला नाही. त्यात गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स सर्वाधित आहेत. वास्तविक त्या धानाची रक्कम मिलर्सकडून व्याजासह वसूल करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्या राईस मिलर्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचे खा.नेते यांनी सांगितले.गोदामांअभावी आदिवासी विकास महामंडळाला शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दरवर्षी उघड्यावर टाकावा लागतो. तो धान नंतर खराब होऊन कवडीमोल भावात विकावा लागतो. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याकडेही नेते यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.महामार्गाच्या विकासाचे गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यातून जाणार असून पाच महामार्ग चारपदरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकास कामांसाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचेही खा.नेते यांनी यावेळी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)आमगावात पुन्हा घेणार आढावाखा.अशोक नेते यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आमगाव-देवरी-सालेकसा या तीन तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि कोणकोणत्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी खा.नेते यांनी शनिवारी आमगाव येथे आढावा बैठक आयोजित केली होती. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीला मात्र २६ विभाग प्रमुखांनी दांडी मारली. त्यामुळे नेते यांनी त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. सोबतच ही बैठक रद्द करून पुन्हा आमगावात आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले.