शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

उन्हाळी धानपिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:29 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकºयांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी,...

ठळक मुद्देसंघटनेची मागणी : शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीला घेऊन सोमवारी संघटनेच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदनही देण्यात आले.जिल्ह्यात अपुºया पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात रोवणी प्रक्रि याही होऊ शकली नाही. गेल्या ४ दशकांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून जिल्हा दुष्काळग्रस्त करण्याची अपेक्षा असताना अद्यापही ती पूर्ण होऊ शकली नाही. केवळ तीन तालुक्यांत अल्पशा दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अर्जुनी-मोर तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे तालुक्यात असलेल्या उपलब्ध जलसाठ्यातून शेतकऱ्यांना उन्हाळी धान पीक दिल्यास निश्चितच खरीप हंगामाचे नुकसान भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे.दरवर्षी तालुक्यात १० हजार ५९० हेक्टर कृषी क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड होत असते. यामुळे शेतकरी व शेतमजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून शहराकडे पलायन करण्याची आवश्यकताही राहत नाही. तालुक्यात ७० ग्रामपंचायत व एक नगरपंचायत मिळून १६० गावे व वाड्या आहेत. यामुळे १०८ गावांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व २५ गावांमध्ये सोलर पंपांच्या योजना कार्यान्वित आहेत. धानपिकाला ७५० मिमी पावसाची गरज असताना यंदा तालुक्यात ९५९ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची प्रशासनाकडे आकडेवारी आहे.विभागीय भूजल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील भूजल पातळीही समाधानकारक आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार २२ नोव्हेंबर रोजी अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार व १७ नोव्हेंबर रोजी खंडविकास अधिकारी यांनी पत्र पाठवून तालुक्यात उन्हाळी धान पीक घेण्यास मज्जाव केला. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाहीर नोटीसही लावण्यात आले आहेत. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असूनही शेतकरी द्विधा मनिस्थतीत आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे विशेष लक्ष देवून तातडीने शेतकºयांना उन्हाळी धान पीक लावण्यास परवानगी द्यावी अन्यथा संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी धान उत्पादक शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.मागणीसाठी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सेवानिवृत्त कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुुरामकर, किशोर तरोणे, बन्सीलाल लंजे, लोकपाल गहाणे, ललित बाळबुद्धे, अश्विन नाकाडे, देवा लंजे, गोपीनाथ लंजे, कवडू गाडेगोणे, लक्ष्मण सोनवाने, महादेव रामटेके, मोहन झोडे, लेकराम कापगते, शालीकराम नाकाडे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.