शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

घटत्या जनावरांमुळे दुग्ध व्यवसायावर अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. आता खेड्यांमध्येही पॅकेटचे दुध मिळू लागले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात पशुधन झाले कमी : दुग्ध व्यवसाय डबघाईस

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : भारत हा कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याचे म्हटले जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. आता खेड्यांमध्येही पॅकेटचे दुध मिळू लागले आहे.ग्रामीण भागामध्ये जनावरे चराई करिता जागा राखीव असायची व गुराखी असायचा. परंतु आज जनावरे चराई करिता गुराखी मिळत नाही. तर चराईच्या जागेवर अतिक्र मण झाले आहे. वैरनाला महागाईची झळ बसली आहे असून दुधाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. देशी जनावरांकडून जास्त दूध उपलब्ध होत नाही, तर संकरित जनावरे शेतकरी विकत घेऊ शकत नाहीत.दुग्ध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी या योजनांचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. शासनाने शेतकºयांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करावी. जेणेकरून ग्रामीण भागातील पशुपालक जनावरे पाळून दुग्धव्यवसाय करू लागतील.यंत्रांचे आगमन आले अंगलटपूर्वी उच्च जातीच्या देशी गाई शेतकरी पाळत होते व त्यापासून शेतकऱ्यांना कष्टाळू बैल मिळायचे. परंतु शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांनी गोधन पाळणे बंद केले आहे. पूर्वी १०-२० एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे २-३ बैलजोडी असायच्या. आज या बैलजोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.