शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो कौशल्य विकायला शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

अनेकांच्या आयुष्यात पुस्तकाने क्रांती केली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांची उदाहरण आहेत. प्रत्येकात सामर्थ्य आहे. त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. परिश्रम केल्यानेच यश मिळते. माणूस हा बुद्धिमान आहे. बुद्धीला ताण द्या. उद्भवलेल्या अडचणी व निर्माण झालेले प्रश्न सोडवायला शिका. नवीन कल्पना मनात येऊ द्या. त्यांना रजिस्टर्ड करा. तुमच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश केला.

ठळक मुद्देनरेंद्र आरेकर : जि.प.विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कोणत्याही मोफत मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते. पूर्वी उदारमतवादी महाराष्ट्र होतं. जागतिकीकरण आपण स्वीकारलं. जागतिकीकरणात प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते, तरच तिचे महत्त्व पटते हे सिध्द झालं आहे. यासाठी कौशल्य विकायला शिका. कौशल्य हे शिक्षण व ज्ञानाने प्राप्त होते असे प्रतिपादन कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले.स्थानिक जि.प.माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गोंदिया जि.प.चे उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले हे होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य राजेश भक्तवर्ती, गिरीश पालिवाल, अर्जुन नागपुरे, मंजुषा चांदेवार, देवेंद्र रहिले, डी.के.मस्के, हेमराज नाकाडे, शंकर लोधी, लालबहादूर चंदेल, सिद्धार्थ टेंभूर्णे, एस.टी.रेहपाडे, पी.टी.बन्सोड, प्राचार्य डी. डब्ल्यू.दिवठे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.एल.नंदागवळी उपस्थित होते.नरेंद्र आरेकर म्हणाले, संस्कृती बदलत चालली आहे. माणूस संकुचित होत आहे. संकुचितपणाची देण १९९० नंतरच्या जागतिकीकरणाने दिली. आपण बदलत चाललो तरी मुलांवर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. संस्कार जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे. ज्ञान हे क्षेत्र पवित्र आहे. नाव, संपत्ती ही ज्ञानाने प्राप्त होते. नाव जन्माने मिळते मात्र मान हा कर्माने मिळते. ज्ञान हे असे एकमेव क्षेत्र आहे की त्यामुळे प्रत्येकाला विद्वान होता येते. येथे रंग, रूप आडवं येत नाही. आजपर्यंत सारेच युग स्पर्धेचे राहिले आहेत. परिस्थिती अशी आहे म्हणून रडण्यापेक्षा परिस्थिती विरुद्ध लढायला शिका. आयुष्यात यश, अपयश येतातच.अनेकांच्या आयुष्यात पुस्तकाने क्रांती केली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांची उदाहरण आहेत. प्रत्येकात सामर्थ्य आहे. त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. परिश्रम केल्यानेच यश मिळते. माणूस हा बुद्धिमान आहे. बुद्धीला ताण द्या. उद्भवलेल्या अडचणी व निर्माण झालेले प्रश्न सोडवायला शिका. नवीन कल्पना मनात येऊ द्या. त्यांना रजिस्टर्ड करा. तुमच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश केला.या वेळी गिरीश पालिवाल, अरविंद शिवणकर, विश्वजीत डोंगरे, हमीद अल्ताफ अकबर अली व रमेश अंबुले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डी.डब्ल्यू.दिवठे यांनी मांडले.स्नेहसंमेलनाचे संचालन आर. डी. करचाल व व्ही. एस. इरले यांनी केले तर उपस्थितांचे आभार एल.व्ही.मुंगूलमारे यांनी मानले.ध्वजारोहणाचा मान विद्यार्थिनीलाभारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापन दिन २६ जानेवारी रोजी पार पडणार आहे. स्थानिक जि.प.कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण जि.प.सदस्य गिरीश पालिवाल यांचे हस्ते होते. हा पायंडा मोडत त्यांनी विद्यालयातून दहावीत प्रथम येणारा परंतु इयत्ता अकरावीत याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देण्याचे जाहीर केले आहे. तर स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण हा विद्यालयातून बारावीत प्रथम येणाºया विद्यार्थ्याच्या करण्यात येणार आहे. यावर्षीच्या ध्वजारोहणाचा मान हर्षिता हरीश पचारे या विद्यार्थिनीला मिळणार आहे. गिरीश पालिवाल यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी