शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पेटताहेत चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले ...

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ग्रामीण भागात तर उज्ज्वला गेला चुलीत असे म्हणत चक्क चुली पेटायला सुरुवात झाली आहे. रान उठवणारे भाजप नेते आता गेले तरी कुठे? असा प्रश्न माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.

इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गॅसचे दर महिन्याला ठरतात यात सातत्याने वाढच होत आहे. १ जुलै रोजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वितरण करतेवेळी मोठा गाजावाजा केला होता. वाढीव दर आता या गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात तर आता चक्क चुली पेटत आहेत. चुली पेटवण्यासाठी सरपण लागतं. सरपणासाठी वृक्षतोड आलीच. त्यामुळे आता वनचोरीचे प्रकार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांना चुली फुंकाव्या लागू नये. चुली फुंकल्याने धुरामुळे महिलांमध्ये फुफ्फुसाचे आजार वाढतात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना आणली होती. ही योजना राबविल्यानंतर ग्रामीण भागात कल बदलला होता. परंतु गॅसचा वारंवार भडका उडत असल्याने पुन्हा जुनेच दिवस आल्याच्या भावना विशेषतः महिला वर्गात व्यक्त केल्या जात आहेत. योजना तर आणली. मात्र ती ग्रामीण जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडेल का? हा विचारच केला गेला नाही. सामान्य जनतेला सबसिडीचे प्रलोभन दाखविले. हळूहळू सबसिडीतही कपात केली. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. या वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे गॅसचा भडका उडतो आहे. महागाई गगनाला भिडली आहे. यामुळे सामान्य जनता जाम वैतागली आहे. गॅसपेक्षा आपली चूलच बरी असा समज ग्रामीणमध्ये पसरत आहे. डिजिटल, शायनिंग इंडियाचे स्वप्न पार धुळीस मिळत असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. गॅसचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.