शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

ग्रामीण भागात पेटताहेत चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले ...

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ग्रामीण भागात तर उज्ज्वला गेला चुलीत असे म्हणत चक्क चुली पेटायला सुरुवात झाली आहे. रान उठवणारे भाजप नेते आता गेले तरी कुठे? असा प्रश्न माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.

इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गॅसचे दर महिन्याला ठरतात यात सातत्याने वाढच होत आहे. १ जुलै रोजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वितरण करतेवेळी मोठा गाजावाजा केला होता. वाढीव दर आता या गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात तर आता चक्क चुली पेटत आहेत. चुली पेटवण्यासाठी सरपण लागतं. सरपणासाठी वृक्षतोड आलीच. त्यामुळे आता वनचोरीचे प्रकार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांना चुली फुंकाव्या लागू नये. चुली फुंकल्याने धुरामुळे महिलांमध्ये फुफ्फुसाचे आजार वाढतात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना आणली होती. ही योजना राबविल्यानंतर ग्रामीण भागात कल बदलला होता. परंतु गॅसचा वारंवार भडका उडत असल्याने पुन्हा जुनेच दिवस आल्याच्या भावना विशेषतः महिला वर्गात व्यक्त केल्या जात आहेत. योजना तर आणली. मात्र ती ग्रामीण जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडेल का? हा विचारच केला गेला नाही. सामान्य जनतेला सबसिडीचे प्रलोभन दाखविले. हळूहळू सबसिडीतही कपात केली. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. या वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे गॅसचा भडका उडतो आहे. महागाई गगनाला भिडली आहे. यामुळे सामान्य जनता जाम वैतागली आहे. गॅसपेक्षा आपली चूलच बरी असा समज ग्रामीणमध्ये पसरत आहे. डिजिटल, शायनिंग इंडियाचे स्वप्न पार धुळीस मिळत असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. गॅसचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.