शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

धानाची उचल संथगतीने, कशी होणार रब्बीची खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि ...

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट या दोन्ही विभागांना देण्यात आले आहे. मात्र यंदा गोदामे रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे. त्यातच गोंधळात १५ दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे उर्वरित पंधरा दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी हाेणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील धानाचे सरासरी उत्पादन सुध्दा जास्त आहे. त्यामुळे ३५ लाख क्विंटलपर्यंत रब्बीतील धानाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र मागील खरीप हंगामातील धान या दोन्ही विभागाच्या गोदामात तसाच पडला आहे. ३५ क्विंटल धानापैकी राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ तीन लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०६ खरेदी केंद्र सुरु केले असले तरी यापैकी प्रत्यक्षात किती केंद्रावर धान खरेदी सुरु आहे याची कल्पना शेतकरी आणि जिल्हावासीयांना चांगलीच आहे.

.............

२८२ राईस मिलर्ससह करार

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. यासाठी २८२ राईस मिलर्ससह करार करण्यात आला. या राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ अडीच लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटलवर धान अद्यापही धान खरेदी करणाऱ्या विविध संस्थांच्या गोदामांमध्ये पडला आहे. त्यामुळेच रब्बीतील खरेदी केलेला धान ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.

.....

उद्दिष्ट २८ लाख क्विंटल धान खरेदीचे

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र १५ जूनपर्यंत केवळ ४ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर गोदाम फुल्ल असल्याने अनेक संस्थांची खरेदी बंद आहे. त्यामुळे उर्वरित १५ दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.............

शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात

गोदाम हाऊसफुल्ल असल्याने अनेक संस्थांची धान खरेदी ठप्प आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तर घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून ते अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

............