शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

धानाची उचल संथगतीने, कशी होणार रब्बीची खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि ...

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट या दोन्ही विभागांना देण्यात आले आहे. मात्र यंदा गोदामे रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे. त्यातच गोंधळात १५ दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे उर्वरित पंधरा दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी हाेणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील धानाचे सरासरी उत्पादन सुध्दा जास्त आहे. त्यामुळे ३५ लाख क्विंटलपर्यंत रब्बीतील धानाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र मागील खरीप हंगामातील धान या दोन्ही विभागाच्या गोदामात तसाच पडला आहे. ३५ क्विंटल धानापैकी राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ तीन लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०६ खरेदी केंद्र सुरु केले असले तरी यापैकी प्रत्यक्षात किती केंद्रावर धान खरेदी सुरु आहे याची कल्पना शेतकरी आणि जिल्हावासीयांना चांगलीच आहे.

.............

२८२ राईस मिलर्ससह करार

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. यासाठी २८२ राईस मिलर्ससह करार करण्यात आला. या राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ अडीच लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटलवर धान अद्यापही धान खरेदी करणाऱ्या विविध संस्थांच्या गोदामांमध्ये पडला आहे. त्यामुळेच रब्बीतील खरेदी केलेला धान ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.

.....

उद्दिष्ट २८ लाख क्विंटल धान खरेदीचे

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र १५ जूनपर्यंत केवळ ४ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर गोदाम फुल्ल असल्याने अनेक संस्थांची खरेदी बंद आहे. त्यामुळे उर्वरित १५ दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.............

शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात

गोदाम हाऊसफुल्ल असल्याने अनेक संस्थांची धान खरेदी ठप्प आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तर घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून ते अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

............