शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

तीळगुळाच्या लाडूने सर्दी, खोकला होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:45 IST

Gondia : संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ खाण्यामागे शास्त्रीय कारण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आपण साजरा करतो त्या प्रत्येक सणाला त्या-त्या ऋतुमानानुसार काही ना काही महत्त्व आणि शास्त्रीय कारणे व महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. संक्रांत हा केवळ एक सण नसून तो शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे या थंडीच्या मोसमात शरीराला ऊब व ऊर्जा देण्याचे काम करतात. तीळगुळाचे लाडू सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो. त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ खाल्ले पाहिजेत, असे आहारतज्ज्ञ सीमा मेश्राम यांनी सांगितले.

हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला वातावरणासोबत अनुकूल करण्यासाठी उष्णता निर्माण करण्याची गरज असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळगूळ खाल्ला जातो. शरीराला अतिशय आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक तीळगुळाच्या मिश्रणातून मिळतात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. 

आरोग्यास फायदे थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर र गूळ गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करीत असतो. तीळ आणि गूळ यांचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य तर सुधारतेच पण शरीरातील चयापचय क्रियाही सुधारते, तसेच सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो.

काय आहे कारण? सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच 'संक्रांत' असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायणदेखील म्हटले जाते. संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तीळगूळ खाल्ले जातात, तसेच या दिवसा- पासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे. 

"हे दोन्ही पदार्थ ऊष्ण असल्यामुळे शरीराला अतिशय आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक तीळगुळाच्या मिश्रणामधून मिळतात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते."- सीमा मेश्राम, आहारतज्ज्ञ

टॅग्स :gondiya-acगोंदियाHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल