शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

तीळगुळाच्या लाडूने सर्दी, खोकला होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:45 IST

Gondia : संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ खाण्यामागे शास्त्रीय कारण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आपण साजरा करतो त्या प्रत्येक सणाला त्या-त्या ऋतुमानानुसार काही ना काही महत्त्व आणि शास्त्रीय कारणे व महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. मकरसंक्रांत हा तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. संक्रांत हा केवळ एक सण नसून तो शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे या थंडीच्या मोसमात शरीराला ऊब व ऊर्जा देण्याचे काम करतात. तीळगुळाचे लाडू सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो. त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ खाल्ले पाहिजेत, असे आहारतज्ज्ञ सीमा मेश्राम यांनी सांगितले.

हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला वातावरणासोबत अनुकूल करण्यासाठी उष्णता निर्माण करण्याची गरज असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळगूळ खाल्ला जातो. शरीराला अतिशय आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक तीळगुळाच्या मिश्रणातून मिळतात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. 

आरोग्यास फायदे थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर र गूळ गूळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करीत असतो. तीळ आणि गूळ यांचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य तर सुधारतेच पण शरीरातील चयापचय क्रियाही सुधारते, तसेच सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो.

काय आहे कारण? सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच 'संक्रांत' असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायणदेखील म्हटले जाते. संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तीळगूळ खाल्ले जातात, तसेच या दिवसा- पासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, अशी आख्यायिका आहे. 

"हे दोन्ही पदार्थ ऊष्ण असल्यामुळे शरीराला अतिशय आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि लोह हे दोन्ही घटक तीळगुळाच्या मिश्रणामधून मिळतात. त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते."- सीमा मेश्राम, आहारतज्ज्ञ

टॅग्स :gondiya-acगोंदियाHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल