शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

दोन दिवसाच्या पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 9:33 PM

जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद : कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागले होते. वेळेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेळेत आटोपली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने रोवणीची कामे खोळबंली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली होती. मात्र तब्बल महिनाभर पाऊस न झाल्याने केलेली रोवणी वाळत चालली होती. परिणामी मागील वर्षी सारखेच पुन्हा यंदाही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी आणि गुरूवारी (दि.१६) जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली. तर सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धानासाठी अनुकुल मानला जातो. यंदा १८ आॅगस्टपर्यंत सरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही सरासरी समाधानकारक आहे. धान हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असल्याने यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवंलबून आहे. मागील दोन तीन वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होतीे. मात्र तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर धरणातील पाणी साठ्यात थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याने त्याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस