शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

जनजागृती व दक्षता ही महत्त्वाची शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तींवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे, मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालिम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपत्ती कधी सांगून येत नसून तिचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती या आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती व दक्षता या शस्त्रांचा वापर करुन पुर परिस्थिती आणि कोरोनावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.४) आयोजित पुर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्र मात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, राज्य आपत्ती दल नागपूर तुकडी क्र मांक-१ चे टिम कमांडर प्र. सहायक समादेश सुरेश कराळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, तहसीलदार राजेश भांडारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तींवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. या वर्षी जिल्हयातील जलाशय, धरण व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुर परिस्थीतीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी, जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. त्याकरिता नियुक्त केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून पुर परिस्थीतीची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळेस नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती नसल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानी कमी करण्यास मदत होईल. कोरोनावर प्रशासन आणि नागरिकांनी मिळून मात करणे शक्य होईल. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करु न दक्षता घेणे महत्वाचे आहेअसे त्यांनी सांगितले.याप्रसंगी कराळे यांनी, सजग नागरिक हा सुरक्षित नागरिक असतो असे सांगून पुराचे प्रकार, पुर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पुर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाºया आवश्यक दक्षतेच्या संदर्भात अनुभव सांगितले. तसेच घरगुती टाकाऊ वस्तुपासून फ्लोटींग डिव्हाईस तयार करून प्रात्यक्षिक दाखविले.खंडबंदा जलाशय येथे रंगीत तालिमप्रशिक्षण कार्यक्र म संपल्यावर तालुक्यातील खडबंदा जलाशय येथे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्याना रंगीत तालमेतून प्रशिक्षण देण्यात आले. खडबंदा जलाशयातील पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रशिक्षण, शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणे, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग आदिंचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात पूर परिस्थितीत कार्य करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे शोध व बचाव दल, अग्निशमन विभागातील अधिकारी छबीलाल पटले व कर्मचारी, तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य आशीष चव्हाण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेतील दीपक परिहार, महेश वंजारी, यादव फरकुंडे आदि या प्रशिक्षण कार्यक्र मात झाले सहभागी होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी