शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

जनजागृती व दक्षता ही महत्त्वाची शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तींवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे, मान्सून पूर्व तयारीची रंगीत तालिम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपत्ती कधी सांगून येत नसून तिचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती या आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती व दक्षता या शस्त्रांचा वापर करुन पुर परिस्थिती आणि कोरोनावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.४) आयोजित पुर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्र मात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, राज्य आपत्ती दल नागपूर तुकडी क्र मांक-१ चे टिम कमांडर प्र. सहायक समादेश सुरेश कराळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, तहसीलदार राजेश भांडारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पुर परिस्थिती असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील तसेच प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन कार्य करावे. शोध व बचाव कामात जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांच्या रंगीत तालमेचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तींवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. या वर्षी जिल्हयातील जलाशय, धरण व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुर परिस्थीतीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी, जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. त्याकरिता नियुक्त केलेल्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून पुर परिस्थीतीची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळेस नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती नसल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानी कमी करण्यास मदत होईल. कोरोनावर प्रशासन आणि नागरिकांनी मिळून मात करणे शक्य होईल. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करु न दक्षता घेणे महत्वाचे आहेअसे त्यांनी सांगितले.याप्रसंगी कराळे यांनी, सजग नागरिक हा सुरक्षित नागरिक असतो असे सांगून पुराचे प्रकार, पुर येण्याची कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पुर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाºया आवश्यक दक्षतेच्या संदर्भात अनुभव सांगितले. तसेच घरगुती टाकाऊ वस्तुपासून फ्लोटींग डिव्हाईस तयार करून प्रात्यक्षिक दाखविले.खंडबंदा जलाशय येथे रंगीत तालिमप्रशिक्षण कार्यक्र म संपल्यावर तालुक्यातील खडबंदा जलाशय येथे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्याना रंगीत तालमेतून प्रशिक्षण देण्यात आले. खडबंदा जलाशयातील पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रशिक्षण, शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणे, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग आदिंचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात पूर परिस्थितीत कार्य करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे शोध व बचाव दल, अग्निशमन विभागातील अधिकारी छबीलाल पटले व कर्मचारी, तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य आशीष चव्हाण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेतील दीपक परिहार, महेश वंजारी, यादव फरकुंडे आदि या प्रशिक्षण कार्यक्र मात झाले सहभागी होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी