शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

धानाचे उत्पादन यंदा २० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:48 AM

धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाची तूट व कीडरोगांचा परिणाम : हवामानाचा अंदाज चुकला,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार एकूण उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. मात्र यंदा हवामान विभागाने सुरूवातीपासूनच चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज सुरूवातीला काही प्रमाणात ठरला. पिकांसाठी अनुकुल वातावरण असल्याने वाढ सुद्धा चांगली झाली.मात्र आता धान निघण्याच्या स्थितीत असताना मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने धानपिके संकटात आली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.महागड्या कीटकनाशकांची फवारणी करुन सुद्धा कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे. यावर्षी धानाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांना हाती आलेली पिके गमाविण्याची पाळी आली आहे.यंदा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात जवळपास ५० हजार हेक्टरला सिंचनाची सोय आहे. बहुतेक शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे.धान निसविण्याच्या कालावधीत पाऊस झाल्यास धान चांगला भरतो व उत्पादनात वाढ होते.मात्र नेमक्या याच कालावधी पाऊस बेपत्ता झाल्याने उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.भारनियमनाची भरआधीच पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आली आहे. त्यामुळे मोटारपंप लावून धरणे, विहिरी, तलावांच्या मदतीने शेतीला सिंचन करीत होते. मात्र मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. आधीच शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असताना त्यात भारनियमनाची भर पडली आहे.किडरोग आणि पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात नेमकी किती टक्के घट होईल हे निश्चित सांगता येईल.- भाऊसाहेब बºहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.