शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

बैलाला सोन्याचा भाव; आमगावच्या बाजारात एक लाखावर मिळतेय जोडी (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST

गोंदिया : बैलांच्या माध्यमातून पारंपरिक शेती करणे आज जवळपास नाहीच्या बरोबरीत झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून अधिक ...

गोंदिया : बैलांच्या माध्यमातून पारंपरिक शेती करणे आज जवळपास नाहीच्या बरोबरीत झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नादात आज बैलजोडीचा वापर कमी होऊ लागला आहे. छोट्या (अल्पभूधारक) शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे. मात्र, मोठे शेतकरी ट्रॅक्टरच्याच मदतीने शेती करतानाचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात आमगावात सर्वात मोठा बैल बाजार भरतो; परंतु कोरोनामुळे या बैल बाजारावरही संक्रांत आली आहे.

आमगावात मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतूनही बैल खरेदी करणारे येत असतात. आमगावच्या बैल बाजारात विक्री करण्यात आलेली बैलजोडी ही एक लाख ५ हजारांत विक्रीला गेली आहे. आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील आदर्श शेतकरी अशोक बालाराम गायधने यांच्या जोडीलाही १ लाख ५ हजारांत मागणी आली आहे; परंतु त्यांनी त्या जोडीपैकी एका वळूला महाराष्ट्र शासनाचा पहिला एक लाखाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांनी त्या बैलाला विक्री केले नाही.

बॉक्स

कोट्यवधीची होते उलाढाल

आमगावच्या बैल बाजारातून बैल विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी या बाजारातून एका दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होत होती; परंतु कारोनामुळे बैल बाजारही १० महिने बंद असल्याने आता बैल बाजारातील उलाढाल कमी झाली आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील ग्राहक आता या बाजारात फिरकत नाहीत. केवळ गोंदिया जिल्ह्यापर्यंत हा बाजार आता सीमित झाला आहे.

बॉक्स

बैलजोडीचा दिवसाचा खर्च

एका बैलजोडीला पशू आहार देण्यासाठी कमीत कमी १५० रुपये दिवसाकाठी खर्च येतो. महिन्याकाठी ४ हजार ५०० रुपये खर्च या बैलजोडीचा असल्याने या बैलजोडीचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आता शक्य नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्री केले आहे.

बॉक्स

दुधाळ जनावरांची मागणी घटली

१) जनावरांचे पशुखाद्य महागल्याने जनावरांना सांभाळणे कठीण झाले. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्नच शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे. मेहनत जास्त असल्याने जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

२) दुधाळ जनावरांपासून दूध मिळविण्यासाठी त्यांचे पालन केले जात होते; परंतु आता दुधाला किंमत नाही आणि चारा महागल्याने जनावरांचे संगोपन करणे योग्य नाही.

३) दुधाला योग्य किंमत मिळेल यासाठी शासनाचे नियोजन नसल्याने आता उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने कोण जनावरे पाळणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

४) दुधाळ जनावरांना खाद्य नियमित लागते. मात्र, दूध देणे बंद झाले की त्यांचे पालनपोषण करणे याची एकंदरीत गोळाबेरीज केल्यास शेतकरी तोट्यात असतो. त्यामुळे कुणी दुधाळ जनावरे घेत नाही.

......

कोट

जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना शासनाने भरघोष मदत करणे आवश्यक आहे. त्या मदतीशिवाय जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांना कठीण आहे. याकडे शासनाने जातीने लक्ष घालावे.

-अशोक गायधने, शेतकरी, शिवणी

.........

जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या जनावरांचे पोट भरावे की आपले भरावे हा प्रश्न उपिस्थत होत आहे. त्यामुळे आजघडीला जनावरे पाळणे परवडत नाही.

दिलीप महारवाडे, शेतकरी, किडंगीपार

..........

दुधाची किंमत व जनावरांच्या खाद्याची किंमत सरासरी सारखीच असल्याने येणाऱ्या दुधाच्या रकमेतून आहाराव्यतिरिक्त पैसे उरत नाहीत. दुधाला किंमत योग्य मिळत नसल्याने दुधाळ जनावरे पाळणे कठीण आहे.

श्रीराम भांडारकर, शेतकरी, किडंगीपार