शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

महाराष्ट्रासह गोंदिया जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. विदेशातून जिल्ह्यात आलेले व ते नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या अश्या एकूण ६२७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु संचारबंदीत नागरिकांना फक्त जीवनावश्यक वस्तूच खेरदीसाठी जाता येईल असे सांगण्यात आले होते. परंतु ज्यांना जीवनावश्यक वस्तूची गरज नाही तरीही काही तरूण रस्त्यावरून इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत.

ठळक मुद्देना मास्क ना सॅनिटायझर : पोलिसांचेही व्हावे कोरोनापासून संरक्षण, दखल घेणार का

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही काही लोक रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्या लोकांना हाकलण्याचे काम पोलीस करीत आहेत. परंतु रात्रेंदिवस राबणाऱ्या या पोलिसांना आतापर्यंत ना मास्क,ना सॅनिटायझर देण्यात आले नाही. जनतेची सेवा करणाºया पोलिसांचीच सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे.महाराष्ट्रासह गोंदिया जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. विदेशातून जिल्ह्यात आलेले व ते नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या अश्या एकूण ६२७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु संचारबंदीत नागरिकांना फक्त जीवनावश्यक वस्तूच खेरदीसाठी जाता येईल असे सांगण्यात आले होते. परंतु ज्यांना जीवनावश्यक वस्तूची गरज नाही तरीही काही तरूण रस्त्यावरून इकडे-तिकडे फिरताना दिसत आहेत. गावागावातील लोक मजुरीसाठी बाहेर गावी गेले असताना ते आता गावात आले. त्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असली तरी ते घरातच राहात आहेत. तपासायला कुणी जात नाही. रूग्णालयात लोक गेले तरी त्यांना तिथे न तपासता गोळी देऊन त्यांना घरी पाठविले जात आहेत. त्यांच्या सानिध्यात आलेले लोक रस्त्यावर येऊन जीवनावश्यक किंवा औषध आणण्याचे कारण सांगून रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. याच दरम्यान पोलीस बंदोबस्त करीत असताना अनेक लोक पोलिसांच्या सानिध्यात येत आहेत. पोलिसांना शासनानकडून मास्क किंवा सॅनिटायझर देणे अपेक्षीत होते. परंतु त्यांना काहीच देण्यात आले नाही. पोलिसांना मास्क न दिल्यामुळे स्वत:चा बचाव म्हणून त्यांनी तोंडाला रुमाल बांधले आहे. परंतु २४ तास नोकरी करणाºया पोलिसांना दिवसाला जास्तवेळ बंदोबस्तात राहताना हात नाकाला, तोंडाला किंवा डोळ्याला लागतोच. त्यांचे हात स्वच्छ असावे यासाठी सॅनिटायझर सोडा साधे साबणही उपलब्ध करण्यात आले नाही.संचारबंदीमुळे शहरासह ग्रामीण भागातही लॉक डाऊनकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे मंगळवारी (दि.२४) सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातही लॉक डाऊनचे चित्र होते. तर काही भागात अद्यापही नागरिकांनी संचारबंदीला गांर्भियाने घेतले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची सुध्दा नागरिकांची समजूत घालताना चांगलीच दमछाक झाली.संचारबंदीत मुक्तसंचार करणाऱ्यांचा करावा बंदोबस्तशासनाने संचारबंदी लागू केली तरीही अनेक लोक कारण नसताना रस्त्यावर येत आहे.पोलीस यंत्रणा चौकात येऊन अनेकांना विचारपूस करीत आहे. परंतु पोलीस यंत्रणा तोकडी असल्यामुळे पोलिसांचा ज्या चौकात बंदोबस्त आहे. त्या चौकाला सोडून दुसºया चौकातून लोक जात आहेत. काही लोक स्वहिताची व देशहितासाठी नैतिक जबाबदारी पाळतांना दिसत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या