शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 12:16 IST

अर्जुनी मोरगाव येथे प्रेरणात्मक व्याख्यान

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : माझ्यात सूर्यासारखं तेज नाही. पण मी काजव्यासारखं चमकेन. मी उडू शकत नाही पण धावेन. धावू शकलो नाही तरी चालू शकेन. नाही चालू शकलो तरी सरपटन जाईन पण ध्येय साध्य करणार. हे क्रांतीचं वय आहे. शिवाजींनी १६-१७ व्या वयात स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं. हीच उमेद जागविण्याची, इतिहास घडविण्याची सुरुवात आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यावं हे आपल्या हाती नसले तरी पुरुषार्थ दाखवणं आपल्या हातात आहे. एकदा ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. प्रेरणात्मक व्याख्यान ऐकण्यासाठी लांबवरून युवावर्ग व पालकवर्गाची उपस्थिती होती.

सोमवारी स्थानिक सरस्वती विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी मंत्री राजकुमार बडोले, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हिरेखन, हेमंत सुटे, डॉ. बल्लभदास भुतडा, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय कापगते, शुभांगी मेंढे, शारदा बडोले उपस्थित होते. प्रारंभी बालासोर येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नांगरे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलं रानपाखरांसारखी असतात. शहरी मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असलाच पाहिजे. कष्ट केलेच पाहिजे. रोजच्या रोज जग बदलतं. अनेक गोष्टी कालबाह्य होतात. बदलत्या परिस्थितीचे ज्ञान अवगत केले पाहिजे. आराम नसायला पाहिजे. आराम करायला लागलो तर गंज चढतो. घाम गाळायचं खरे वय १८ ते २८ आहे. वाट लागायचंही वय हेच आहे. योग्य ते स्वीकारा. आयुष्यात कधी मोठं अन् कधी लहान, कधी कडक अन कधी मृदू व्हायचं ते कळलं पाहिजे. हळूहळू पण निश्चितपणे जे वाटचाल करतात ते यशस्वी होतात. स्वतःबद्दल व शत्रूबद्दल माहिती असली पाहिजे. बलस्थाने व दुर्बलस्थाने तसेच संधी आणि धोके याचं विश्लेषण करा. यशाचा मार्ग गवसतो. स्वतःची ओळख बनवायला शिका. आयुष्यात तपश्चर्या व चढउतार असलेच पाहिजेत. डोळ्यात स्वप्नं असली पाहिजेत. तत्त्वांशी प्रामाणिक राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. मोबाइल व व्यसनांपासून दूर राहा. मुलींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, हल्लीची परिस्थिती योग्य नाही. स्वतःला सांभाळलं पाहिजे. मुलींनो, स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा. संकटाला घाबरायचं नाही, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

गुणवंतांचा सत्कार

अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सुरबन बोडगाव येथील मूळचा रहिवासी असलेला अमित उंदिरवाडे याने यूपीएससी परीक्षेत ५८१ वी रँक मिळवली. त्याचे भरभरून कौतुक करत सत्कार केला. सोबतच हेमंत सुटे, योगिता मोझे, काजल रुखमोडे, धीरज भिवगडे सौंदड, पर्व रामटेके खजरी, मीनाक्षी कोसरकर खजरी, ईशिता उंदिरवाडे देवरी, हिमांशी करंजेकर, प्रेरणा हासिजा, हितेश्वरी शहारे, यशपाल गोंडाणे, आचल गुप्ता सालेकसा यांचा सत्कार केला.

कार्यक्रम राजकीय की अराजकीय?

कार्यक्रमाचे बॅनर, प्रचार प्रसारात कुठेही राजकीय पक्षाचे चिन्ह नव्हते. आयोजक हे राजकुमार बडोले व युथ फाउंडेशन हे होते. मात्र मंचावर भाषण करताना माजी मंत्र्यांना राहावलं नाही. त्यांनी आपण केलेल्या कार्याचा भाषणातून पाढा वाचलाच. आयोजकांपैकी राजकुमार बडोले हे मंचावर असले तरी युथ फाउंडेशनच्या एकही कार्यकर्त्याला मंचावर स्थान नव्हते हे विशेष. यामुळे हा राजकीय कार्यक्रम तर नाही ना? अशा चर्चा कार्यक्रमस्थळी होत्या.

टॅग्स :Educationशिक्षणVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलSocialसामाजिकgondiya-acगोंदियाCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन