शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 12:16 IST

अर्जुनी मोरगाव येथे प्रेरणात्मक व्याख्यान

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : माझ्यात सूर्यासारखं तेज नाही. पण मी काजव्यासारखं चमकेन. मी उडू शकत नाही पण धावेन. धावू शकलो नाही तरी चालू शकेन. नाही चालू शकलो तरी सरपटन जाईन पण ध्येय साध्य करणार. हे क्रांतीचं वय आहे. शिवाजींनी १६-१७ व्या वयात स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं. हीच उमेद जागविण्याची, इतिहास घडविण्याची सुरुवात आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यावं हे आपल्या हाती नसले तरी पुरुषार्थ दाखवणं आपल्या हातात आहे. एकदा ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. प्रेरणात्मक व्याख्यान ऐकण्यासाठी लांबवरून युवावर्ग व पालकवर्गाची उपस्थिती होती.

सोमवारी स्थानिक सरस्वती विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी मंत्री राजकुमार बडोले, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हिरेखन, हेमंत सुटे, डॉ. बल्लभदास भुतडा, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय कापगते, शुभांगी मेंढे, शारदा बडोले उपस्थित होते. प्रारंभी बालासोर येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नांगरे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलं रानपाखरांसारखी असतात. शहरी मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असलाच पाहिजे. कष्ट केलेच पाहिजे. रोजच्या रोज जग बदलतं. अनेक गोष्टी कालबाह्य होतात. बदलत्या परिस्थितीचे ज्ञान अवगत केले पाहिजे. आराम नसायला पाहिजे. आराम करायला लागलो तर गंज चढतो. घाम गाळायचं खरे वय १८ ते २८ आहे. वाट लागायचंही वय हेच आहे. योग्य ते स्वीकारा. आयुष्यात कधी मोठं अन् कधी लहान, कधी कडक अन कधी मृदू व्हायचं ते कळलं पाहिजे. हळूहळू पण निश्चितपणे जे वाटचाल करतात ते यशस्वी होतात. स्वतःबद्दल व शत्रूबद्दल माहिती असली पाहिजे. बलस्थाने व दुर्बलस्थाने तसेच संधी आणि धोके याचं विश्लेषण करा. यशाचा मार्ग गवसतो. स्वतःची ओळख बनवायला शिका. आयुष्यात तपश्चर्या व चढउतार असलेच पाहिजेत. डोळ्यात स्वप्नं असली पाहिजेत. तत्त्वांशी प्रामाणिक राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. मोबाइल व व्यसनांपासून दूर राहा. मुलींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, हल्लीची परिस्थिती योग्य नाही. स्वतःला सांभाळलं पाहिजे. मुलींनो, स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा. संकटाला घाबरायचं नाही, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

गुणवंतांचा सत्कार

अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सुरबन बोडगाव येथील मूळचा रहिवासी असलेला अमित उंदिरवाडे याने यूपीएससी परीक्षेत ५८१ वी रँक मिळवली. त्याचे भरभरून कौतुक करत सत्कार केला. सोबतच हेमंत सुटे, योगिता मोझे, काजल रुखमोडे, धीरज भिवगडे सौंदड, पर्व रामटेके खजरी, मीनाक्षी कोसरकर खजरी, ईशिता उंदिरवाडे देवरी, हिमांशी करंजेकर, प्रेरणा हासिजा, हितेश्वरी शहारे, यशपाल गोंडाणे, आचल गुप्ता सालेकसा यांचा सत्कार केला.

कार्यक्रम राजकीय की अराजकीय?

कार्यक्रमाचे बॅनर, प्रचार प्रसारात कुठेही राजकीय पक्षाचे चिन्ह नव्हते. आयोजक हे राजकुमार बडोले व युथ फाउंडेशन हे होते. मात्र मंचावर भाषण करताना माजी मंत्र्यांना राहावलं नाही. त्यांनी आपण केलेल्या कार्याचा भाषणातून पाढा वाचलाच. आयोजकांपैकी राजकुमार बडोले हे मंचावर असले तरी युथ फाउंडेशनच्या एकही कार्यकर्त्याला मंचावर स्थान नव्हते हे विशेष. यामुळे हा राजकीय कार्यक्रम तर नाही ना? अशा चर्चा कार्यक्रमस्थळी होत्या.

टॅग्स :Educationशिक्षणVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलSocialसामाजिकgondiya-acगोंदियाCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन