शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आता ठरलं १२ फेब्रुवारीला विराजमान होणार गावकारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. आता १२ ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. आता १२ फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड केली जाणार असून त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी काढले आहे. त्यामुळे आता गावकारभारी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहेत. यंदा सरपंचाची निवड सदस्यांमध्ये केली जाणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असेल तर त्या प्रवर्गाचा सरपंच विराजमान होणार आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये पॅनल निहाय सदस्य निवडून आले आहे. त्यामुळे एकाच पॅनलमध्ये सरपंच पदासाठी दोन तीन दावेदार आहे. तर काही पॅनलचे बहुमत असले तरी त्यांच्याकडे सरपंच पदाच्या प्रवर्गाचा सदस्य नसल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे पळवापळवीचे राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हिच शक्यता लक्षात घेऊन राजकीय पक्ष व पॅनलने आपल्या सदस्यांना सरपंचपदाच्या निवडणुकीपर्यंत पर्यटनस्थळी पाठविले आहे. तर काही ठिकाणी सदस्य भूमिगत झाल्याचे चित्र आहे. १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे याच दिवशी गावकऱ्यांना आपल्या गावचा प्रमुख कारभारी कोण होणार हे कळणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष १२ फेब्रुवारीकडे लागले आहे.

.................

पर्यटनाला गेलेले सदस्य १२ ला परतणार

१२ फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या सदस्यांमध्ये कुठलीही फूट पडू नये यासाठी पर्यटनाला गेलेले सदस्य १२ फेब्रुवारीला सकाळीच आपल्या गावात परतणार आहेत. हे सदस्य नेमके कोणत्या ठिकाणी आहे याची फार गुप्तता त्या पॅनलकडून बाळगली जात आहे.

......

प्रमुखांची होतेय धांदल

सरपंच आणि उपसरपंच निवडची प्रक्रिया १२ फेब्रुवारीला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पॅनल प्रमुख आणि गावातील पक्षाच्या प्रमुखांची या पदी नेमके कुणाला विराजमान करायचे, असे करीत असताना इतर सदस्य नाराज होणार नाही ना याची सुद्धा काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वांचे मन राखताना प्रमुखांची चांगली धांदल उडत आहे.