शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गरजू शिधापत्रिकाधारक धान्यपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन्याला पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देशिधापत्रिका झाल्या जीर्ण। कित्येक कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : राज्य शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत पुरविण्यात आलेली शिधापत्रिकेचा आवश्यक दस्तऐवज म्हणून दैनंदिन कामकाजात उपयोग केला जातो. तालुक्यातील गरजवंतांनी नव्याने शिधापत्रिका तयार केल्या. परंतु त्या गरजू शिधापत्रिकाधारकांना आजपावेतो अन्नधान्याचे वाटपच करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नाहीत.तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन्याला पुरवठा केला जातो. एकाच कुटुंबातील सदस्यांनी आपल्या कुटुंबासह वेगळ्या शिधापत्रिका नियमानुसार तयार केल्या. नव्याने शिधापत्रिका तयार करून आता कित्येक दिवस लोटले असून आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर भोळीभाबडी जनता दिवस काढत आहे. मात्र त्यांच्या नशिबी फक्त प्रतिक्षाच आहे. स्वत: रितशीर अर्ज करून नव्याने बनविलेल्या शिधापत्रिकेवर अन्नधान्याचा पुरवठा करा अशी विनंती केल्यावरही त्यांना धान्याचा पुरवठा आजघडीपर्यंत करण्यात आला नाही. असा प्रकार तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागात सुरू असल्याचे समजते.तालुक्यात असे अनेक कुटुंब स्वस्त धान्य दुकानामार्फत दिल्या जाणाऱ्या धान्यापासून वंचित असल्याची ओरड आहे. एवढेच काय तर, मागील २०-२५ वर्षांपासून गावातील रहिवाशी असूनही त्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही असेही कुटुंब तालुक्यात आहेत. परिणामी ते शासनाच्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून आले. सध्या कोणत्याही विभागात शिधापत्रिकाचा पुरावा ग्राह्य धरला जातो. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन शिधापत्रिकांचा पुरवठा होऊन शकल्याने आज त्या पुर्णत: जीर्णावस्थेत असून शेवटची घटका मोजत आहेत. गावकुसातील साधाभोळा शिधापत्रिकाधारक कार्यालयात गेला तर त्याला वारंवार चकरा माराव्या लागतात. परंतु काही दुकानदारामार्फत आले तर आर्थिक हित जपून त्यांचे विनाविलंब काम होत असल्याचीही ओरड आहे. एकंदरित अनेक शिधापत्रिकाधारक कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक