शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

निर्यात शुल्क वाढ; दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील राइस मिलची चाके थांबली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 14:40 IST

५०० कोटी रुपयांचे नुकसान : हजारो मजुरांचा रोजगार हिरावला, शेतकऱ्यांना फटका

गोंदिया : केंद्र सरकारने उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क तर अरवा तांदळाच्या निर्यातीवर २३ ऑगस्टपासून बंदी घातली आहे. तांदळाची निर्यात थांबल्याने २३ सप्टेंबरपासून पूर्व विदर्भातील ६७५ मिल बंद पडल्या असून यावरून अवलंबून असणाऱ्या ५० हजारांपेक्षा जास्त मजुरांचा रोजगारसुद्धा हिरावला आहे.

मागील दोन महिन्यांपासून शासनाने यावर कसलाच ताेडगा न काढल्याने राइस मिल उद्योग डबघाईस आला असून हीच स्थिती राहिल्यास याचा शेतकऱ्यांनासुध्दा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतल्या जाते. त्यामुळे यावर आधारित राइस मिल उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगातून ६० हजारावर मजुरांना रोजगार मिळतो. तर पूर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणात चांगल्या तांदळाची विदेशात निर्यात केली जाते. यात उष्णा तांदूळ (बायल राइस) अरवा तांदूळ (साधा तांदूळ) मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.

पूर्व विदर्भात ६७५ राइस मिल असून यातून धानाची भरडाई करून तो देश-विदेशात पाठविला जातो. यामुळे धानालासुद्धा चांगला दर मिळण्यास मदत होते. पण केंद्र सरकारने २३ ऑगस्टपासून अरवा तांदळावर निर्यात बंदी तर उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क केले. परिणामी तांदळाची निर्यात थांबली आहे. परिणामी १५ सप्टेंबरपासून धान भरडाई बंद आहे. निर्यात शुल्क रद्द करून तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याची मागणी विदर्भ राइस मिल असोसिएशन केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. पण त्यांनी मागील दोन महिन्यांपासून यावर कुठलाही तोडगा न काढल्याने पूर्व विदर्भातील राइस मिलची चाके थांबली आहेत. परिणामी यावर अवलंबून असणार ६० हजारांवर मजुरांचा रोजगार सुद्धा हिरावला आहे.

धानाच्या दरावर होणार परिणाम

केंद्र सरकारने अरवा तांदळावर निर्यात बंदी आणि उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यापूर्वी खुल्या बाजारपेठेत धानाला २४०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनासुध्दा चांगला दर मिळण्यास मदत होत होती. पण ऐन खरीप हंगामातील धानाची आवक सुरू झाली असताना केंद्र सरकारच्या धोरणामुळे धानाचे भाव पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तर राइस मिल उद्योग डबघाईस

केंद्र सरकारच्या राइस मिल विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यांपासून धानाची भरडाई बंद असल्याने ज़वळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर यावर अवलंबून असणाऱ्या ६० हजारांवर मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने तांदळावरील निर्यात बंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क कमी न केल्यास पूर्व विदर्भातील राइस मिल उद्योग पूर्णपणे डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विदर्भ राइस मिल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रPaddyभातFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया