शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

लेकरांचे भवितव्य घडणार कसे? १८ शाळा, वर्ग पाच अन् शिक्षक एकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:53 IST

शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ : अर्जूनी मोरगाव तालुक्यातील चित्र

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : शासन शिक्षणविषयक कितीही कायदे करीत असले तरी राज्यात सर्वत्र शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. एक तर कोरोनाकाळात शिक्षण गमावलं. आता शासनाच्या नियोजनशून्य निर्णयाची सामान्य जनता बळी ठरत आहे. एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच वर्ग आणि एक शिक्षक असलेल्या तब्बल १८ शाळा आहेत. आता तुम्हीच सांगा राज्यकर्तेहो लेकरांचे भवितव्य घडणार कसे, ओल्या मातीच्या गोळ्याला शिक्षक आकार देणार कसे, आमच्या पाल्यांचे भवितव्य घडणार तरी कसे, असे नानाविध प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित केले जात आहेत.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे चित्र अत्यंत विदारक आहे. शाळा इमारती आहेत. भौतिक सुविधाही आहेत. शाळा आहेत, पण शिक्षण नाही अशी दैन्यावस्था आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा पार खालावलेला आहे. मंगळवारी लोकमत प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात एका शाळेला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. एक शिक्षक शाळेचा दर्जा सुधारूच शकत नाही असे जळजळीत वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीवनगर, अर्जुनी तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर ही शाळा आहे. लोकसंख्या २५०. मात्र, शाळेची पटसंख्या ४१ आहे. या शाळेत चार वर्गांसाठी केवळ एक शिक्षक कार्यरत आहे. या गावच्या ग्रामस्थांचा अत्याधिक विश्वास जि.प. शाळेवर आहे. गावाची अल्प लोकसंख्या असली तरी त्या तुलनेत पटसंख्या मोठी आहे. हे विश्वासाचेच प्रतीक आहे. दुसरी शाळा आहे महागावची. गावाच्या नावाप्रमाणेच या गावची लोकसंख्या ५४९६ आहे. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या गावच्या जि.प.शाळेत केवळ २२ पटसंख्या आहे. या गावात तशा आणखी इतर तीन शाळा आहेत. इतर शाळांची पटसंख्या मात्र जि.प.शाळेच्या तुलनेत बऱ्यापैकी आहे. कॉन्व्हेंट संस्कृती की आणखी काही कारण असू शकते. एवढ्या मोठ्या गावच्या शाळेत एक ते पाच वर्गांसाठी केवळ एक शिक्षक शिकवायला असेल तर काय चित्र असणार, किंबहुना अशा गावात शिक्षकांची संख्या वाढवून प्राथमिक शिक्षणाला अधिक उभारी देण्याचे प्रयोग केले पाहिजेत.

वर्ग पाच...शिक्षक एक

तालुक्यात पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असलेल्या जि.प. शाळांत एक शिक्षक कार्यरत असलेली १८ गावे आहेत. यात करडगाव बोळदे, राजीवनगर (ताडगाव), जानवा, महागाव, बंध्या, ब्राह्मणटोला, देऊळगाव, बोदरा, कवठा, डोंगरगाव, डोंगरगाव, संजयनगर, पुष्पनगर (अ), चिचटोला,पुष्पनगर (ब), जब्बारखेडा, भसबोळण, खडकी, धमदीटोला व केळवद या शाळांचा समावेश आहे. जानवा येथील शाळेत एकमेव असलेले शिक्षक ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. अशीच स्थिती आणखी काही शाळांची आहे.

किमान दोन शिक्षक हवेत !

प्रत्येक प्राथमिक शाळेत किमान दोन शिक्षक हवेत हे शासनानेच धोरण आहे. मात्र, या धोरणाचे श्राद्ध झाल्याचे पदोपदी जाणवते. राजीवनगर येथील शाळेच्या अगदी बाजूलाच विस्तीर्ण तलाव आहे. एखादा विद्यार्थी शिक्षकाची नजर चुकवून गेलाच तर त्याला जबाबदार कोण, बिचाऱ्या शिक्षकाचा दोष नसताना तो व्यवस्थेचा बळी ठरू शकतो. याव्यतिरिक्त अध्ययनासोबतच शिक्षकाला शालेय पोषण आहाराची पूर्वव्यवस्था, रेकॉर्ड ऑनलाइन भरणे, माहिती संकलित करून वरिष्ठांना सादर करणे, सर्व वर्गांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे, उपक्रम राबवणे, प्रशासकीय व बँकेची कामे, सभा, प्रशिक्षणाला उपस्थिती अशी अनेक कामे करावी लागतात. तो एकटा शिक्षक ही सारी कामे कशी पार पाडणार, हा यक्षप्रश्न आहे.

अर्धे शिकण्यात, तर अर्धे गोंधळात

वर्ग चार आणि शिक्षक एकच असल्याने चारही वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकाचीसुध्दा तारांबळ उडते. असाच काहीसा अनुभव राजीवनगर येथील शाळेला भेट दिल्यानंतर आला. शिक्षक एका वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी गोंधळ करीत होते, तर काही अभ्यास करीत असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळाTeacherशिक्षकgondiya-acगोंदिया