शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसांत कशी होणार २३ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र ...

गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. रब्बीच्या धान खरेदीसाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. २३ लाख क्विंटल धान खरेदी होणे अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे नऊ दिवसांत एवढी धान खरेदी होणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहावे लागणार आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत दरवर्षी खरिपानंतर रब्बीतील धानाची शासकीय धान खरेदी केली जाते. या धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत असते. याचदरम्यान पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने शासकीय धान खरेदी बंद केली जाते. मात्र यंदा मागील खरीप हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने रब्बीतील धान खरेदी सुरू होण्यास विलंब झाला आहे. गोदामे रिकामी झाली नसल्याने ३७ लाख क्विंटल धान गोदामात पडले आहे. हीच स्थिती पूर्व विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांची आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली, तर रब्बी धान खरेदीचा तिढा सुटला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही, शिवाय धानाची विक्री करूनच ते खरिपाचे नियोजन करीत असतात. त्यामुळे दोन्हीकडून त्यांची कोंडी झाली आहे. परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना १३०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. यामुळे त्यांना प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासन सगळे ऑल इज वेल असल्याचे दाखवित आहे.

...................

महिनाभरात ७ लाख क्विंटल धान खरेदी

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बीतील धान खरेदीसाठी ११४ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावरून आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीची स्थिती यापेक्षा बिकट आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील पूर्ण धान खासगी व्यापाऱ्यांनाच विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, हमीभावापासून वंचित राहावे लागले.

................

केवळ ३ लाख क्विंटल धानाची उचल

गेल्या खरीप हंगामातील ३३ लाख क्विंटल धानापैकी आतापर्यंत राईस मिलर्स भरडाईसाठी केवळ ३ लाख ११ हजार क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटल धान अद्यापही विविध गोदामांमध्ये पडला आहे. धान भरडाईसाठी २८८ राईस मिलर्सने करार केले असून, प्रत्यक्षात ७० ते ७५ राईस मिलर्सने धानाची उचल केली असल्याने समस्येत वाढ झाली आहे.

..............

चुकारे आणि बोनस थकले

खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही, तर रब्बी हंगामात ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याचे १३४ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळे बळीराजाची आर्थिक कोंडी झाली आहे.