शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी

By admin | Updated: May 2, 2017 00:32 IST

मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली ....

सहेसराम कोरोटे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्रकारांशी साधला संवादसालेकसा : मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली व आश्वासनांचे लॉलीपॉप देण्याचे काम केले. परंतु प्रत्यक्षात या अडीच वर्षात शासनाने शेतकऱ्यांना कोणतीच मदत केली नाही. पोकळ आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी अन्यथा येणाऱ्या काळात जनता व शेतकरी वर्ग या शासनाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेसराम कोरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना कोरोटे यांनी, सत्तेवर येण्यापूर्वी जे लोक धानाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी करीत होते, तेच लोक आता सत्तेवर आल्यानंतर धानाला योग्य समर्थन मूल्य न देता साधा बोनस सुद्धा देऊ शकत नाही. तसेच नियमितरित्या कृषी उत्पादनाची खरेदी पण करु शकत नाही. व्यापाऱ्यांशी संगणमत करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याची कामे शासनातील लोकांनी सुरू केली आहे. दीड वर्षापूर्वी सरकारने सालेकसा तालुक्यातील नऊ गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले होते व त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा गाजावाजा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला होता.परंतु दीड वर्ष लोटूनही त्यांनी शेतकऱ्यांना कवडीसुद्धा फेकून मारली नाही. अर्थातच विद्यमान सरकार घोषणाबाजी करण्यात पटाईत झालेली आहे. प्रत्यक्षात जनतेशी काही देणे-घेणे ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. एवढी थट्टा या आधीच्या सरकारने कधीच केली नव्हती. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची तूर खरेदी बाबत ही सरकार तळ्यात-मळ्यात खेळ करीत आहे व शेतकऱ्यांना त्रस्त करण्याचे काम करीत आहे. शेतीत धानाशिवाय इतर गौण उत्पादन शेतकरी घेत असतात मात्र त्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे दिसत आहे. एकंदरित विद्यमान शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटातून संघर्ष करीत आहे. असे असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा देण्यासाठी सरकार मागे पुढे पाहत आहे. असे शेतकरी विरोधी सरकार कोणत्याच कामाचे नाही असे मत कोरोटे यांनी व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)