शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने चांगले दिवस नाही, तर चांगले क्षण तरी आणावे

By admin | Updated: December 22, 2014 22:50 IST

कॉंग्रेसच्या शासनकाळात धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल हमी भावाची मागणी करून याच भाजपच्या नेत्यांनी गोंदिया-भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन केले होते.

गोंदिया : कॉंग्रेसच्या शासनकाळात धानाला तीन हजार रूपये प्रती क्विंटल हमी भावाची मागणी करून याच भाजपच्या नेत्यांनी गोंदिया-भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर सत्तेत आल्यास भाजप सरकार शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करणार, असे सांगत फिरत शेतकऱ्यांना चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखवित होते. आता मात्र सत्तेवर आल्यावर हेच भाजप सरकार धानाला एक हजार ३६० रूपये हमी भाव देऊन आत्महत्या करण्यासाठी मजबूर करीत आहे. आता या भाजप सरकारने सात/बारा कोरा करून चांगले दिवस नाही तर किमान सरसकट १० हजार रूपये हेक्टरी मदत देऊन चांगले क्षण तरी आणावे, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली.
गोंदिया-भंडारा- गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची पुरजोरपणे बाजू मांडत वेळप्रसंगी तिव्र आंदोलनाचाइशारा ही सरकारला दिला.
आमदार अग्रवाल यांनी, दुष्काळग्रस्त राज्यात केंद्र सरकारच्या आदेशावरून राज्य सरकारला बोनस देण्यावर बंदी लावली आहे. एकीकडे कॉंग्रेस शासनकाळात मागील वर्षी २०१३ मध्ये धानाला एक हजार ५१० रूपये प्रती क्वींटल हमी भाव दिला जात होता. यावर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस व अथर्मंत्री मुनगंटीवार यांनी रस्ता रोको करून तीन हजार रूपये भावाची मागणी केली होती. आता मात्र केंद्र व राज्यात भाजप सरकार व राज्यात हे दोघे मुख्य असताना एक हजार ३६० हमी भाव दिला जात आहे.
कॉंग्रेसने आपल्या शासनकाळात शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आता पाळी भाजप सरकारची असून त्यांनी दिलेल्या आश्वासना नुसार वागण्याची वेळ आली असू धानाला सरसकट १० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची देण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. तर गजर पडल्यास धान उत्पादन शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी विधानसभेत दिला. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या मुद्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)