शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लॉकडाऊनच्या कालावधीत मिळाला हातांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM

मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात.

ठळक मुद्देग्रामसभेची झाली मदत : ११ दिवसांत अडीचे कोटीचे उत्पन्न

गजानन शिवणकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : ग्रुप ऑफ ग्रामसभा (देवरी) यांनी वनहक्क कायदा २००६ नुसार गठीत ग्रामसंघाच्या महासंघातील आदवासी व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्क धारक) समुदायाने लॉकडाऊनच्या कालावधीत तेंदूपत्ता संकलन व विक्री करुन ११ दिवसांत अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. शिवाय, यामुळे शेकडो हातांना रोजगार सुद्धा मिळाला आहे.मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हे कार्य प्रभावित होऊन अनेक कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. सदर गावे जंगलालगत असल्याने शेती इतकेच किंबहुना अधिक महत्त्व या वनहक्क धारकाला वनोपज गोळा करुन विकण्यास आहे. तेंदूपत्ता संग्रहनाचे मुख्य ठिकाण देवरी आहे. या महासंघात समाविष्ट एकूण महसुली गावे २८ व टोले, पाडे मिळून ४२ ग्रामसभेतील ५०६९ कुटुंब काम करतात.यामुळे प्रती व्यक्ती १५-२० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पण यंदा कोरोनामुळे तेंदूपत्ता संकलनाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शासनाने तेंदूपत्ता संकलन करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल व इतर उपाययोजना करण्याच्या अटीवर तेंदूपत्ता संकलनास मंजुरी दिली. विदर्भ उपजिवीका मंचचे पदाधिकारी दिलीप गोडे, तांत्रिक अधिकारी वासुदेव कुलमेथे, ललीत भांडारकर तसेच ग्रामसभेचे पदाधिकारी मोतीराम सयाम, नारायण सलामे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. पोलीस अधीक्षकांनी ग्रामसभेत संचारबंदीत नियम व अटीशर्तीच्या आधारे संकलन केंद्र सुरु करण्यात परवानगी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील अनेक गरीब व गरजू आदिवासी, गैरआदिवासी व भूमिहिन नागरिकांना झाला. यामुळे वनहक्क प्राप्त गावच्या अनेक ग्रामसभा व त्यांचे महासंघांना तेंदूपाने गोळा करुन विक्री करणे शक्य झाले.त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ग्रुप ऑफ ग्रामसभा महासंघात समाविष्ट असलेल्या एकूण ४२ गावांतील एकूण ४८१३४३० तेंदूपुडे वनहक्कधारकांनी प्राप्त अधिकार राबवित संकलीत करुन ५२०९ रुपये प्र.मा.गोणीप्रमाणे विक्री केली. ज्यात २४४० पुरुष व ५९० महिला असे एकूण ३२३० कुटुंबांना सरासरी १५ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त होण्यास मदत झाली. यातून एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. अशाप्रकारे तेंदूपत्ता संकलनाच्या प्राप्त निधीतून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उद्दिष्टाने अनेक गावे विकासात्मक सामूहिक व सामाजिक कार्य ग्रामसभेत सुरु आहेत. विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांना मालकी हक्क प्राप्त झाल्यामुळे लोक स्वेच्छेने वनांचे संरक्षण करुन तेंदू झाडांच्या बुथ कटाईवर ग्रामसभेत प्रतिबंध लावण्यात आले आहे.यामुळे वृक्षांचे संवर्धन करण्यास मदत होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेकरीता गोडे व त्यांचे सहकारी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर तसेच ग्रुप ऑफ ग्रामसभेचे पदाधिकारी मोतीराम सयाम, नारायम सलामे, तेजराम मडावी यांनी सहकार्य केले.शेती करण्यास झाली मदततेंदूपत्ता संकलनातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामीण भागातील नागरिक खरीप हंगामात शेती करतात. या उत्पन्नातून शेतीच्या मशागतीची कामे, खते, बियाणे, मजुरीचा खर्च देण्यास त्यांना मदत होते. तर काही जण तलाव ठेक्याने घेवून त्यात मासेमारी करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तेंदूपत्ता संकलन करणे महत्त्वपूर्ण रोजगार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक