शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Gondia: तुझी-माझी जोडी सगळ्यांत न्यारी, नोंदणी करणारी, ५९९ जोडप्यांनी केली विवाह नोंदणी

By कपिल केकत | Updated: January 18, 2024 21:49 IST

Gondia News: विवाहात होणारा अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या आजच्या पिढीत वाढताना दिसत आहे. नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह आटोपून घेण्याची पद्धती वाढत चालली आहे.

- कपिल केकतगोंदिया - विवाहात होणारा अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या आजच्या पिढीत वाढताना दिसत आहे. नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह आटोपून घेण्याची पद्धती वाढत चालली असून, त्यानंतर ही लग्नगाठ अधिक मजबूत करण्यासाठी ते विवाह नोंदणीवर जास्त भर देत आहेत. हेच कारण आहे की, विवाह नोंदणीचा आकडा वाढताना दिसत आहे.

‘घर म्हणते बांधून बघ व विवाह म्हणते करून बघ’ अशी म्हण प्रचलित असून, घरात जेवढा पैसा लावला तेवढा कमीच असतो व विवाहावरही जेवढा पैसा लावला तेवढा कमीच असतो, असा याचा अर्थ आहे. ही म्हण वास्तविकतेला जुळणारी असून, कित्येक विवाह जीवनात एकदाच होत असल्याने धूमधडाक्यात करण्यासाठी लाखो रुपये ओततात. विवाहावर जेवढा पैसा खर्च करा तेवढा कमीच असल्याने पैशांची उधळण करण्यापेक्षा तेवढा पैसा वर-वधूंना भविष्यासाठी देणे जास्त फायद्याचे असते. नेमकी हीच धारणा आजच्या पिढीत निर्माण झाली आहे. यातूनच आजची पिढी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्यावर भर देतात. दोन्ही बाजूंचे नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडतो व असे कित्येक विवाह आता बघावयास मिळत आहेत.

विशेष म्हणजे, साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेतल्यानंतर मात्र आजची पिढी आपल्या विवाह बंधनाला अधिक घट्ट करण्यासाठी न विसरता विवाह नोंदणी करीत आहे. हेच कारण आहे की, कधी काळी विवाह होऊन कित्येक वर्षे लोटल्यानंतरही विवाहाची नोंदणी केली नव्हती. आता मात्र विवाह होताच विवाह नोंदणी केली जात असून, यामुळेच विवाह नोंदणीचा आकडा वाढताना दिसत आहे. नगर परिषद विवाह नोंदणी कार्यालयात सन २०२२ मध्ये ५३७ विवाह नोंदणी करण्यात आले आहेत. तर सन २०२३ मध्ये त्यात वाढ झाली असून, ५९९ विवाह नोंद करण्यात आल्याची नोंद आहे. म्हणजेच, विवाह नोंदणी करण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढताना दिसत आहे.

विवाह नोंदणीबाबत जनजागृतीची गरज- दरवर्षी जिल्ह्यात हजारोंच्या घरात विवाह सोहळे पार पडतात. मात्र, झालेल्या विवाहांची नोंदणी मात्र शेकड्यातच दिसून येते. यामागचे कारण म्हणजे, आजही कित्येकांना विवाह नोंदणी करण्याची गरज काय आहे, याबाबत माहिती नाही. आजच्या पिढीत बहुतांश वर-वधू दोघेही नोकरी करणारे असल्याने पुढे जाऊन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज पडते व त्यासाठी ते विवाह नोंदणी करवून घेतात. याबाबत सर्वसामान्यांनाही माहिती मिळावी, यासाठी विवाह नोंदणीबाबत जनजागृतीची गरज आहे.

 नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, नगरसेवकाचे प्रमाणपत्र, वर-वधूचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, विवाह पत्रिका, पंडित किंवा विवाह करवून देणाऱ्या संस्थेचे प्रमाणपत्र, कोर्ट तिकीट, सुरू वर्षाची घर कर पावती, तीन साक्षीदार व त्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड व प्रत्येकी एक पासपोर्ट फोटो. या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स व ती प्रमाणित केलेली असावी.

२०२२ व २०२३ मध्ये नोंदणी झालेले विवाह

महिना- २०२२- २०२३जानेवारी- २३-२३फेब्रुवारी-४२-१८मार्च- ५९-५१एप्रिल- ४९- ६१मे- ४३- ५९जून- ७२-८७जुलै- ५६-८३ऑगस्ट- ४३-५३सप्टेंबर- ३७-५३ऑक्टोबर- १७-३९नोव्हेंबर- ४८-३१डिसेंबर- ४८- ५०एकूण- ५३७- ५९९

टॅग्स :marriageलग्न