शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST

राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला ...

राजकुमार बडोले : कार्यकर्ता मेळावा

सडक अर्जुनी : येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे. येणाऱ्या जि.प.व पं.स. निवडणुकीत पक्ष ज्या कार्यकर्त्यांला तिकीट देईल त्यासाठी आपण इमानेइतबारे काम करावे. जि.प.व पं.स. निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागून आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांनी जिद्द ठेवून काम करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

तालुक्यातील पांढरी जि.प.सर्कलच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रनिहाय मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी कोसमतोंडी येथे करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले, लक्ष्मीकांत धनगाये, शेषराव गिऱ्हेपुंजे, जे.डी. जगणीत अध्यक्ष अनुसूचित जाती, देवराम राहांगडाले, डॉ. बबन कांबळे, गिरिधारी हत्तीमारे, विश्वनाथ राहांगडाले, मनोहर काशीवार, चेतन वडगाये, भाजयुमो तालुकाध्यक्ष विलास बागडकर, शिशिर येळे, पांढरी जि.प. प्रमुख जगदीश काशीवार, महेंद्र टेंभरे, विजय बावनकर, किशोर मळकाम, प्रकाश काशीवार,अनिल गजभिये, माणिक चौधरी, प्रमोद खोब्रागडे, किशोर खोब्रागडे, मनोहर बावने, रामचंद्र काशीवार,भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे आणि पांढरी जि.प.चे प्रभारी लक्ष्मीकांत धनगाये व पांढरी जि.प.क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याप्रसंगी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचासुद्धा पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

बडोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे शासन शेतकरी हिताचे नसून दलालांचे शासन आहे. या शासनाने कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांनी वीजबिल भरू नये, कोरोना संक्रमण काळातील वीजबिल माफ करण्यात येईल असा डिंडोरा पिटला; पण वीजबिल माफी तर सोडा, आता शासन वीज कनेक्शन तोडण्याच्या तयारीत आहे. फडणवीस सरकारमध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे एका एकरावर १६ क्विंटल धान्य खरेदी केले जात होते. ते या आघाडी शासनाने एकरी १३ क्विंटलवर आणले. आघाडी शासन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे नसून त्यांना लुबाडणारे शासन असल्याचा आरोप त्यांनी केला.