शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून आलेल्यांची तपासणी व चौकशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात तीन दिवसांपूर्वी आलेल्या काही कुटूंब आणि शिक्षणासाठी गेलेल्या युवकाची साधी आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याविषयी नगर पंचायतकडून माहीती घेतली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही.

ठळक मुद्देकोरोनाची दहशत : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यात बाहेरील राज्यातून बरेच नागरीक परत आले आहे. काही शिक्षण घेण्यासाठी गेले होते तर काही रोजगारासाठी. मात्र स्थानिक प्रशासनाने यांची साधी तपासणी किंवा चौकशी केली नाही. बाहेरील राज्यातून गोरेगाव येथे परतणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यापासून संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात तीन दिवसांपूर्वी आलेल्या काही कुटूंब आणि शिक्षणासाठी गेलेल्या युवकाची साधी आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याविषयी नगर पंचायतकडून माहीती घेतली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही. याविषयी सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी नगर पंचायत प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत शहरात दवंडी देत बाहेरील राज्यातून आलेल्या नागरीकांविषयी माहीती देण्याचे आवाहन केले असले तरी भितीपोटी कुणीही माहिती द्यायला पुढे आलेले नाही. ज्या ज्या वॉर्डात बाहेरील राज्यातून नागरीक आले आहे. त्या-त्या वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता तालुक्यात कोरोना दहशत असताना जमावबंदी संचारबंदी कायदा अंमलात आणण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव पोलीस स्टेशन अतंर्गत ७३ गावे येतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ४५ कर्मचारी कार्यरत आहेत.यापैकी काही कर्मचारी रात्रपाळीत गस्तीवर काही रजेवर तर काही दैनंदिन कामात व्यस्त राहतात. अशा वेळी उरलेल्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण भार येतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यात नागरिकही तेवढेच दोषी आहेत.पोलीस नागरिकांसाठी झटत आहे ही भावना नागरिकांना अद्यापही लक्षात येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या