शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

शिक्षण विभागाने तूर्तास शाळा सुरू करु नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

प्रारुप आराखडा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पंधरवाड्यामध्ये राज्याच्या शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासबंधीचा निर्णय घेवून सदर शिक्षण पद्धती ऑनलाईन की ऑफलाईन देणे हे तेथील स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील असे सूचविले आहे.

ठळक मुद्देशालेय व्यवस्थापन समिती : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : शैक्षणिक सत्र २०२०-२१ मधील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्य.) सर्व मुख्याध्यापकांना पत्र देवून २६ जूनपासून शाळा सुरु करण्यासंबधी सूचना देऊन शाळा कशा पद्धतीने सुरु करण्यात येतील याबाबत कळविले. तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर शाळा व्यवस्थापन व शिक्षक समितीच्या सभांचे आयोजन करुन शाळेतील सर्व भौतिक सोई सुविधा व विद्यार्थ्याची सुरक्षितता याचा परिपूर्ण विचार करुन स्वतंत्र नियोजनासह अहवाल मागीतला. त्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी बोलाविलेल्या सभेत तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला.देशावर कोरोनाच्या महामारीचे संकट घोंगावत असताना शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये २६ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत.प्रारुप आराखडा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पंधरवाड्यामध्ये राज्याच्या शिक्षण संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासबंधीचा निर्णय घेवून सदर शिक्षण पद्धती ऑनलाईन की ऑफलाईन देणे हे तेथील स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील असे सूचविले आहे.त्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) यांनी ५ जून रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांना पत्र पाठवून शाळेतील भौतिक सोई सुविधा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता याचा परिपूर्ण विचार शाळा व्यवस्थापन व शिक्षण समितीच्या सभेत करुन आपल्या शाळेचे स्वतंत्र नियोजन तथा अहवाल मुख्याध्यापकांना मागीतला आहे.सदर पत्रावर त्वरीत कार्यवाही म्हणून मुख्याध्यापकांनी सभांचे आयोजन करुन शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलेल्या अटी व शर्तीचे वाचन व तसा अहवाल तथा प्रारुप देण्यात आला.त्यामध्ये प्रामुख्याने शासनाने शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस किंवा खात्रीशीर औषधीचे विद्यार्थ्यांना वाटप करुनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे नाही आणि त्याचबरोबर शिक्षण पद्धती ऑफलाईन असावी, मोबाईल व्यवस्था ग्रामीण भागात उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी माघारल्या शिवाय राहणार नाही, असे मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी