शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हावासीयांनो, मास्क लावणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांमध्ये नोंदविली जाणारी दररोजच्या कोरोना बाधितांची संख्या आता १ अंकी झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या आजघडीला १०० च्या आत आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : अन्यथा १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत असून, नवीन बाधितांची दररोजची आकडेवारी कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला नसतानाही नागरिकांकडून कोरोनाविषयक उपाययोजनांना बगल दिली जात आहे. कित्येक नागरिक मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. तर बाजार व अन्य ठिकाणांवरही शारीरिक अंतराचे पालन टा‌ळले जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हावासीयांना मास्क लावणे अनिवार्य असल्याचे आदेश काढले आहेत. अन्यथा १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. 

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तेव्हा प्रत्येकजण मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर या तीन शस्त्रांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होते. मात्र दिवाळीनंतर कोरोनाच उद्रेक कमी झाला असून, जिल्ह्यात कधी ३ अंकांमध्ये नोंदविली जाणारी दररोजच्या कोरोना बाधितांची संख्या आता १ अंकी झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णांची संख्या आजघडीला १०० च्या आत आली आहे. ही जिल्ह्यासाठी नक्कीच दिलासादायक बाब असली तरिही याचा अर्थ कोरोना पूर्णपणे गेला, असा होत नाही. कारण, आताही दररोज नवीन बाधितांची भर पडत असून, कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत चालली आहे. हे टाळता येणार नाही. 

अशात जिल्हावासीयांनी आजही पूर्वीप्रमाणेच कोरोनाविषयक ३ शस्त्रांचे न विसरता पालन करण्याची गरज दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याचा अर्थ जिल्हावासी काही भलताच काढत आहेत. नेमकी हीच बाब हेरून व जिल्हावासीयांच्या या अतिरेकी वागणुकीला बघता जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार, असे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे मास्क हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरले असल्याने मास्कचा वापर अनिवार्य राहणार, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आदेशातून कळविले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार  शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.  

५०० ऐवजी आता १०० रुपयांचा दंड मध्यंतरी कोरोनाचा उद्रेक असताना जिल्ह्यात मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र मध्यंतरी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीत हा दंड कमी करीत १०० रुपयांवर आणला आहे. त्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांवर १०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी दंडासाठी नाही, तर किमान आपल्या व पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तरी मास्क लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी