शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नवेगावबांध येथे संचारबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे.

ठळक मुद्देना मास्क, ना शारीरिक अंत, प्रशासन कुंभकर्णी झोपेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्हा प्रशासनाने शिथील केलेल्या अटींचा गैरफायदा नागरिक घेत असून मास्क न वापरता अनेकजण खुलेआम फिरत आहेत. शारीरिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरूवारी (ता.२१) जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. यातील बहुतांश रूग्ण अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील असल्याचे समजते. हे सर्व रूग्ण मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतून आले आहेत. असे असताना गावातील स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरूवातीला ‘लॉकडाऊन’ १,२ व ३ मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु आता अचानक येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे. मोबाईल, किराणा, कापड, देशी दारूचे दुकान, जनरल स्टोअर्स, स्वस्त धान्य दुकान, पान व पहाच्या टपऱ्या जवळपास सर्वच बाजारपेठ खुल्लमखुल्ला सुरू आहे.गुरूवारी (ता.२१) सायंकाळी आझाद चौकात भररस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान व हातठेले यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कोरोनाचा आणखी धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.तालुका प्रशासनाचे एकमेकांकडे बोटनाका-तोंडाला मास्क किंवा रूमाल न बांधणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तरूणाई तर दुचाकीवर कधी दोघे, तर कधी तिघे बसवून फिरत नियम धाब्यावर टाकत आहे. परंतु कारवाईसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पोलीस विभाग ग्रामपंचायतकडे तर, ग्रामपंचायत महसूल विभागाकडे बोट दाखवतो. यांच्यात समन्वयाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती फक्त कागदावरच उरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या