शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ अभियान केवळ कागदावरच

By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST

महात्मा गांधीच्या नावावर राज्यासह संपूर्ण देशात गांधीगिरी दाखवून शासन कार्य करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांची नकल मारून सरकार चालणार नाही व कामेसुद्धा होणार नाही.

गावात कचरा-बाहेर घाण : सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर केली जाते घाणपरसवाडा : महात्मा गांधीच्या नावावर राज्यासह संपूर्ण देशात गांधीगिरी दाखवून शासन कार्य करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांची नकल मारून सरकार चालणार नाही व कामेसुद्धा होणार नाही. भारत स्वच्छ अभियानाबाबत शासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत आदी प्रत्येक ठिकाणी अध्यादेशाचे पत्र देण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी शपथही घेतली. पण महिना लोटल्यावरही अनेक कार्यालये, गाव व रस्त्यावरची घाण स्वच्छ झाली नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावरच काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाच्या वतीने पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. ते त्या संबंधित भाषण देऊन मोकळे झाले. परंतु अशाने देश व गाव स्वच्छ होणार नाही. जे पदाधिकारी स्वत:ला जनतेचे सेवक समझतात, त्यांनी तरी किंवा त्यांच्या कुंटुबीयांनी तरी घरासमोरील नालीतील कचरा स्वच्छ केला आहे का? फक्त फोटो काढून वर्तमानपत्रात किंवा टी.व्ही. चॅनलसमोर हातात झाडू घेवून उभे राहून स्वच्छता होत नाही. आताची जनता हुशार व समझदार आहे. किमान या बाबी तरी जनता समजू शकते, एवढी बुद्धी त्यांच्यात आहेच.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी ा संत गाडगेबाबा यांनी स्वत: कार्य केले. परिश्रम घेतले. नंतरच त्यांनी त्याबाबत उपदेश केला. त्यांनी आधी केले व करताकरताच सांगितले. त्यामुळे त्यांच्या सांगण्याचा प्रभाव पडून त्यांचे विचार नागरिकांनी आत्मसात केले होते. त्यांनी देशाची शान राखली. त्यांनी खोटे बोलून कधीही फसवेगिरी केली नाही. त्यामुळे जनता त्यांना आजही अभिवादन करते.परंतु त्यांच्या नावावर सरकार कार्यक्रम राबवूनही जनता, पदाधिकारी व अधिकाऱ्यांना ते जमले नाही. निर्मल भारत स्वच्छता अभियानाच्या नावावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. पण एक रुपयाचाही फायदा होत नाही. शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा. हा पैसा अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या घशात जावून एकही गाव हवे तसे निर्मल झाले नाही. काही ठिकाणी तर अभियानच राबविण्यात आले नाही. पण निर्मल गावाचा पुरस्कार अनेक गावांनी मिळविले आहेत.ग्रामीण व शहरी भागातील जुण्या झोपडपट्टीकडे बघितले तर कचरा गावाबाहेर, १०० मीटर अंतरापासून घाणच घाण, शासकीय कार्यालयातील शौचालयात गेले तर बघूनच होत नाही. गुटखा, तंबाखू व पान खावून थुंकण्याचे रंगीबेरंगी चिन्हे आढळतात. स्वच्छता अभियानातही शाळा, शासकीय परिसर, आरोग्य विभागातील रूग्णालये, उपकेंद्रातील परिसर बघण्यासारखे आहेत. शासन करोडो रुपये खर्च करते. कर्मचारी अधिकारी खर्च करतात. पण कचरा ट्रालीने असतो. हिरवा कचरा वाळूनही काढला जात नाही. ग्रामीण भागात एक म्हण सतत म्हटली जाते, ‘खेड्याची वस्ती, घाणीसाठी रस्ती.’ ही खरोखरच लाजीरवाणी बाब आहे.सकाळ व संध्याकाळ प्रत्येक गावात रस्त्यावर पुरूष व महिला शौचालयासाठी रस्त्यावर बसतात. पण पुरूषवर्ग तर ठाण बसून असतो. पण ज्यांना आपण लक्ष्मीदेवी यासारखी अनेक नावे देतो, ती रस्त्यावर बसून सतत ‘स्टँड अप, सिट डाऊन’ करीत असते. आजही ग्रामीण भागातील महिलेची हिच व्यथा आहे.जोपर्यंत पदाधिकारी, अधिकारी व जनता आपली मानसिकता बदलविणार नाही, तोपर्यंत गावे स्वच्छ होवून देश स्वच्छ होवू शकणार नाही. अन्यथा स्वच्छता अभियान हे केवळ कागदावरच राहूत त्याचा लाभ होवू शकणार नाही. (वार्ताहर)