शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंतातूर : महिनाभरात केवळ १६३.३० सरासरी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या राज्याला ओलेचिंब करणारा पाऊस जिल्ह्यात मात्र दडी मारून बसल्याचे दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी म्हणजेच सरासरी २४४.१७ एवढा पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ५३८८.८७ मीमी म्हणजेच सरासरी १६३.३० एवढाच पाऊस बरसलेला आहे. एकंदर जिल्ह्यात अपेक्षेच्या तुलनेत २६६८.८४ मीमी पावसाची तूट असून त्याची ८०.८७ सरासरी आहे. पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतातूर आहे.यंदाचा उन्हाळा कोरोनाने गाजविला असतानाच जिल्ह्यातील तापमानानेही ४६ डिग्री पार मजल मारली होती. एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे उन्हाचे चटके खात जिल्हावासीयांनी कसाबसा उन्हाळा काढला.७ जूनपासून मृग नक्षत्र लागले व आता तरी उकाड्यापासून सुटका होणार अशी आस धरून बसलेल्या जिल्हावासीयांना मात्र पावसानेही दगा दिल्याचे दिसत आहे. मान्सून लागल्यानंतरही तुरळक पाऊस जिल्ह्यात बरसला असून अजूनही जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आकाशात दररोज ढग दाटून येतात व निघून जातात असाच खेळ जिल्ह्यात सुरू असल्याने कधी पाऊस धो-धो बरसणार याची वाट आता सर्वच बघत आहेत. जिल्ह्याची पावसाची आकडेवारीनुसार, ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी पाऊस बरसणे अपेक्षित आहे. त्याची सरासरी २४४.१७ एवढी आहे.मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.मात्र शनिवारीही (दि.४) दुपारपर्यंतच्या ढगाळ वातावरणानंतर उन्ह तापू लागल्याने पावसाने पुन्हा दगा दिला आहे. यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाची तूट निर्माण झाली असल्याने यंदा जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी७ जून रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयाने मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणीपूर्व कामे आटोपली.काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी करून टाकली. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी वाळत चालली असून अशात शेतकºयांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे. कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व हाती पैसा नसल्याने कशी तरी जुळवाजुळव करून खरिपासाठी शेतात उतरलेल्या शेतकºयांची फजिती झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत पावसाने आपली कृपा न केल्यास मात्र दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव कशी करायची हीच चिंता शेतकºयांना सतावित आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक तूटजिल्ह्यात मान्सून सुरू झाल्यानंतर महिनाभरात ८०.८७ सरासरी पावसाची तूट दिसून येत असतानाच जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हेच चित्र दिसून येत आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक १२८.८ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे. त्यानंतर गोंदिया तालुका दुसºया क्रमांकावर असून येथे ११६.५९ सरासरी पावसाची तूट आहे. तर गोरेगाव तालुक्यात ३८.५४, तिरोडा तालुक्यात ५४.६५, देवरी तालुक्यात ७८.३१, आमगाव तालुक्यात ५९.२१, सालेकसा तालुक्यात ८९.९२ तर सडक-अर्जुनी तालुक्यात ४२.७७ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस