शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सर्व जाती धर्मांना जोडण्याचे प्रयत्न

By admin | Updated: May 2, 2017 00:29 IST

सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून प्रत्येक पालक आपल्या कन्येच्या कन्यादानाचे पुण्य कमावित आहे.

गोपालदास अग्रवाल : कामठा येथे पार पडला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गोंदिया : सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून प्रत्येक पालक आपल्या कन्येच्या कन्यादानाचे पुण्य कमावित आहे. त्यांच्या या पुण्यकार्यात मदत करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. यासाठी सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन करीत आहेत. या आयोजनातून सर्व जाती व धर्मांना एक मंचावर आणून जोडण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले. कामठा येथे प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टच्या वतीने (दि.२८) अक्षयतृतीयेच्या दिनी आयोजीत सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. या विवाह सोहळ््याला आ.संजय पुराम, उमा अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, डॉ. झामसिंग बघेले, अ‍ॅड. के. आर. शेंडे, खिलेश्वरबाबा खरकाटे, प्रेमसागर गणवीर, जि.प.सभापती पी.जी.कटरे, सरपंच कल्पना खरकाटे, गोपालबाबा खरकाटे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, जि.प.सभापती विमल नागपूरे, रमेश अंबुले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगावच्या पं.स. सभापती हेमलता डोये, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले उपस्थित होते. आ.अग्रवाल पुढे म्हणाले,या विवाह सोहळ््याच्या माध्यमातून क्षेत्रात एक नवी वैचारीक क्रांती आणण्याचे आमचे प्रयत्न आहे. जोपर्यंत समाजातील प्रत्येक श्रीमंत-गरीब व्यक्ती सामूहिक विवाह सोहळ््याच्या माध्यमातून विवाह करण्याची परंपरा सुरू करीत नाही तोवर हे प्रयत्न सुरूच राहणार आहे. आ.पुराम यांनी, राजकारणासोबतच सामाजीक कार्यात हा सामूहिक विवाह सोहळा महत्वाचा असून सर्व धर्मांना एकाच मंचावर आणण्याची आ.अग्रवाल यांची संकल्पना प्रशंसनीय असल्याचे म्हणाले. शिवणकर यांनी, या विवाह सोहळ््यातून सर्व धर्मीयांना एक मंच मिळाले असून ते आपूलकीच्या भावनेतून या पुण्य कार्यात सहभागी होत असल्याचे मत व्यक्त केले. जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, विवाह सोहळ््यांती फिजूलखर्ची रोखण्यासाठी हे आयोजन महत्वाचे असल्याचे मत जिल्हाधिकारी काळे यांनी व्यक्त केले. आ. अग्रवाल यांनी क्षेत्रात विकासकामे आणून विकासाचे राजकारण केले आहे. सोबतच विवाह सोहळ््याच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येत जोडप्यांना परियणसुत्रात बांधण्यात आले, असे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ म्हणाले. प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी टिकाराम भाजीपाले, बाजार समिती संचालक सावलराम महारवाडे, देवेंद्र अग्रवाल, हुकूमचंद नागपूरे, संतोष घरसेले, संजय अग्रवाल, मुन्ना खरकाटे, लक्ष्मण तावाडे, मिर्ज जमील बेग, रमन लिल्हारे, दिनेश अग्रवाल, झुन्नू खरकाटे, दीपक मालगुजार, आलोक मोहंती, कैलाश अग्रवाल, भूवन सोलंकी, मोनू खरकाटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)६५ जोडप्यांचे शुभमंगलकामठा येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ््यात विविध जाती धर्मातील ६५ जोडप्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ‘शुभमंगल’ करण्यात आले. यात बौद्ध समाजातील जोडपींचा विवाह भंते बुद्धकिर्ती यांनी लावला. तर हिंदू धर्मातील जोडप्यांसाठी चुटे यांनी मंगलाष्टके गायीली. या जोडप्यांना आ. अग्रवाल यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, ाांड्यांचे सेट, टेबल पंखा व सुटकेस भेट देण्यात आली. ट्रस्टकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. सोलापूरच्या चमूने लावणी सादर केली.