शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाहन चालकांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

२००५ पासून आजपर्यंत अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल भागात गरोदर माता आणि ० ते १ वर्षातील बालकांना सुरळीतपणे रुग्णवाहिकेने सेवा दिली. पाऊस, ऊन्ह, वादळ हे न बघता रात्रंदिवस २४ तास सेवेत तत्पर राहतात. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती.

ठळक मुद्दे२५ दिवसानंतर घेतला निर्णय : ६७ वाहन चालक सेवेवर परतणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिका (क्रमांक-१०२) या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत. त्या रुग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहन चालकांना ११ महिन्यांच्या करारावर आदेश देण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेने काही काळानंतर म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्यांना रोजंदारीवर दाखविले. त्यामुळे मागील २५ दिवसांपासून हे रूग्णवाहिका चालक उपोषणावर बसले होते. परंतु देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे २४ तास सेवा देण्यासाठी रूग्णवाहिका चालक कामावर परतण्यासाठी आंदोलन मागे घेतले आहे.२००५ पासून आजपर्यंत अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल भागात गरोदर माता आणि ० ते १ वर्षातील बालकांना सुरळीतपणे रुग्णवाहिकेने सेवा दिली. पाऊस, ऊन्ह, वादळ हे न बघता रात्रंदिवस २४ तास सेवेत तत्पर राहतात. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. परंतु त्या कंत्राटी वाहन चालकांना जिल्हा परिषदेने २ वर्षापूर्वी भोपाळ येथील कंपनीचे कर्मचारी दाखविले. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राट द्यावे असे स्थायी समितीच्या सभेत ठरविल्यावर ते पूर्वी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचेच वाहन चालक होते असे लक्षात आले.जिल्हा परिषदेतील वरिष्ठ पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतेच पत्र न पाहता त्या ६७ वाहन चालकांना ठेकेदारांच्या हातात देवून टाकले. कंत्राटी तत्वावर असलेल्या वाहन चालकांना रोजंदारीवर करून टाकले. तो आदेश रोजंदारी वाहन चालकांकरिता होता. परंतु कंत्राटी तत्वावर असलेल्या या वाहन चालकांना तो आदेश चुकीच्या पद्धतीने लावल्याचा आरोप या वाहन चालकांचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाहन चालक होते तसा पुरावा देखील त्यांच्याकडे आहे.जिल्हा परिषदमार्फत आदेशान्वये आम्हाला ठेकेदारी मुक्त करुन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आदेश देवून त्यात समाविष्ट करण्याची मागणी वाहन चालकांनी केली होती. परंतु त्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे मागील २५ दिवसांपासून ते उपोषणावर बसले होते. परंतु कोरोनाचा संसर्ग पाहता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२०) रोजी आ. विजय रहांगडाले यांनी त्यांच्या आंदोलन मंडपाला भेट दिली होती.त्याचवेळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस