शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षांनंतर वाढले विद्यावेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:35 IST

बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कायदा करून श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत त्यांचा उत्थानासाठी पाऊले उचलण्यात आले.

ठळक मुद्दे४३ लाख बालकामगार : १५० रूपयावरुन झाले ४०० रुपये

नरेश रहिले।आॅनलाईन लोकमतगोंदिया : बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कायदा करून श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत त्यांचा उत्थानासाठी पाऊले उचलण्यात आले. देशात आजघडीला ४३ लाख ५३ हजार २४७ बालकामगारांची नोंद शासन दरबारी आहे. त्यांना १९९४ पासून केवळ १५० रूपये प्रतिमहा या प्रमाणे विद्यावेतन दिले जायचे. मागील २३ वर्षापासून तितकेच विद्यावेतन दिले जात असल्याने बाल मजुरांच्या समस्येत पुन्हा वाढ झाली. शासनाने २३ वर्षानंतर त्यांच्या विद्यावेतनात २५० रूपयाने वाढ केली असून आता ४०० विद्यावेतन निश्चित केले आहे.बालवय मनुष्यच्या जीवनात आनंदाचे क्षण देणारे असते. कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहात नाही. आपल्याच धुंदीत राहणाऱ्या काही बालकांवर धोक्याच्या ठिकाणी काम करून पोटाची खळगी भरण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा कुठलेच दुर्देव नाही. कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालके देशभरात आहेत. देशात बालकामगारांची संख्या सर्वाधीक असणारे राज्य उत्तरप्रदेश असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ४ लाख ९६ हजार ९१६ बालकामगार असल्याची नोंद सरकारकडे आहे. आई-वडीलांच्या दुर्लक्षीतपणामुळे मांग गारुडी, नाथजोगी यांची मुले बालमजुरीकडे वळतात.सरकारद्वारे बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना दर महिन्याला १५० रूपये विद्यावेतन दिले जात होते. त्यामुळे बालमजुरी फोफावत होती. त्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी ही सातत्याने मागणी होत होती. ती मागणी आता श्रम व रोजगार मंत्रालय दिल्ली यांनी ३१ आॅक्टोबर २०१७ पूर्ण केली आहे. १ एप्रिल २०१७ पासूनच्या विद्यावेतनाची वाढीव रक्कम बालकामगारांच्या आई-वडीलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.गोंदिया जिल्ह्यात बालमजुरी करणाऱ्यांचीही संख्या ४८६ आहे. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत झाली. तर २३२ बाल मजुरांसाठी ७ नवीन विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत. बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १२ प्रशिक्षण केंद्र आहेत. यात ३८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजयनगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यात बाबाटोली, मुरकुडोहदंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत.२२०० बालकामगारांना पकडलेबाल कामगार कार्यालयद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगारांना प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके आपल्या पायावर उभी झाली आहेत. तर काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत.सर्वेक्षण पुढील महिन्यातबालकामगार शोध मोहीम जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार आयुक्त कार्यालयाकडून जानेवारी महिन्यात राबविण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात आणखी किती बालकामगार आहेत त्यांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर शोध मोहीमेची निश्चीत तारीख ठरविण्यात येईल.