शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते.

ठळक मुद्देदुसऱ्या गणवेशाचे २ कोटी २६ लाख रुपये अडले : विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाचे दिले पैसे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरीब श्रीमंत अशी दुफळी दूर करण्यासाठी शासनाने शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याचे नियम लावले.जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतात. यासाठी एका गणवेशाकरिता ३०० रूपये असे दोन गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासनाकडून दिले जाते. मात्र यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे वळते करण्यात आली. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांचा दुसऱ्या गणवेश देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन तीन महिने लोटत असतांना एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांनाकडे वळते करण्यात आले. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यातच आले नाही.दुसºया गणवेशाची रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.गोंदिया जिल्ह्यात जि.प.शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीचे ४ हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश द्यायचे होते. दोन गणवेशापैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात टाकल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत.परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. दुसऱ्या गणवेशाच्या रकमेसाठी शासनाकडून कार्यवाही का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.२ कोटी २६ लाख रुपयांची गरजजिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश देण्यासाठी २ कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयाची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही.

टॅग्स :Schoolशाळा