शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

मुंडकारांचे रक्षण करणार? मुख्यमंत्री सावंतांचे कौतुक, पण पोलीस बाजू घेतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:44 IST

मुख्यमंत्र्यांनी हा विषय अधिक सखोलपणे समजून घेऊन जर मामलेदारांना योग्य आदेश दिले, कायद्यात दुरुस्त्या केल्या, तरच मुंडकारांचे कल्याण होईल.

राज्यातील कुळ आणि मुंडकारांची प्रकरणे अजूनही जलद निकालात निघत नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंडकार खटले लवकर निकाली काढण्यासाठी काही उपाययोजना केली. शनिवारीदेखील मामलेदारांनी सुनावणी घेऊन अर्ज हातावेगळे करावेत, अशी व्यवस्था केली. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक करावे लागेल. महसूल न्यायालयात २०२२ पूर्वी मुंडकारविरुद्ध भाटकार असे अडीच हजार खटले होते. त्यापैकी २ हजार ३०० प्रकरणे निकाली काढली गेली, असा दावा सरकारने केला आहे. हे खटले निकाली काढल्यानंतर नवे १ हजार ८०० दावे आले. कारण, मुंडकारप्रकरणी तोपर्यंत मुख्यमंत्री व मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनीही बरीच जागृती केली. अन्य काही आमदारांनीही जागृती केली असावी. राजकीय व्यवस्था धीट बनल्याने खटल्यांची संख्या वाढली, मुंडकारांना धाडस आल्याने ते दावे करू लागले, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नवी आकडेवारी परवाच विधानसभेत दिली. 

मात्र, गावागावांतील लोकांना, मुंडकारांना बोलावून जर मुख्यमंत्र्यांनी विचारले तर खटले लवकर निकालात निघत नाहीत, हे मुख्यमंत्र्यांना कळून येईल. शिवाय अजून शेकडो मुंडकारांनी दावेच केलेले नाहीत, हेही लक्षात येईल. भाटकारांच्या भीतीपोटी मुंडकार अजून हव्या त्या प्रमाणात पुढे येत नाहीत. तुम्ही कायदेशीर हक्क मागाल, तुम्ही खटला दाखल कराल तर आम्ही तुमची वाट बंद करू किंवा तुमचे झोपडीवजा घर पाडू अशा धमक्या दिल्या जातात. असे बरेच अनुभव बार्देश, पेडणे, फोंडा अशा काही तालुक्यांतील गरीब मुंडकार सांगतात. या मुंडकारांचा कैवार घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आता प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल. मंत्री मोन्सेरात यांना हे काम जमणार नाही. ते मुंडकारांना न्याय देऊ शकणार नाहीत. 

यापूर्वीही कोणत्याच महसूलमंत्र्याने मुंडकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही. कोणत्याच कृषी मंत्र्यानेही कधीच प्रामाणिकपणे कुळांचे अश्रू पुसण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. मुख्यमंत्री सावंत यांना मुंडकार वर्गाच्या समस्या आणि खरी दुखणी थोडी तरी ठाऊक आहेत. त्यांना स्वतःला मुंडकारी व्यवस्थेचा अनुभव आहे. खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्व मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी दिवसभराचा एक वर्ग आयोजित करायला हवा. तिथे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ वकील, आजी-माजी अॅडव्होकेट जनरल वगैरेंना पाचारण करावे लागेल.

अनेक मामलेदारदेखील गोंधळलेले आहेत. कायद्यांमध्ये स्पष्टता नाही. काही कलमांविषयी त्रुटी आहेत. आम्हाला मनात असूनदेखील काहीवेळा मुंडकारांच्या बाजूने निवाडे देता येत नाहीत, असे काही मामलेदार सांगतात. या मामलेदारांशी संवाद साधण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागेल. एखाद्या मुंडकाराला घरासाठी तीनशे चौ. मीटर जागा दिली तरी, त्याच्या घराकडे जाण्यासाठी छोटी वाट सोडली जाते. जास्त रुंद वाट दिली जात नाही. पूर्वी दुचाक्या नेण्यासाठी जेवढी जागा होती, तेवढीच मंजूर केली जाते. एक कार नेण्याएवढीही वाट सोडली जात नाही. मामलेदार तशी तरतूदही आपल्या निवाड्यात करत नाहीत. ते म्हणतात कायद्याने तशी मान्यता दिलेली नाही. 

मुख्यमंत्र्यांनी हा विषय अधिक सखोलपणे समजून घेऊन जर मामलेदारांना योग्य आदेश दिले, कायद्यात दुरुस्त्या केल्या, तरच मुंडकारांचे कल्याण होईल. अन्यथा प्रत्येक विधानसभेत केवळ निष्फळ चर्चाच होत राहील. मगो पक्षाच्या राजवटीत एकेकाळी मुंडकार व कुळांच्या हिताचे कायदे आले. मात्र, काळानुसार त्यात जे बदल व्हायला हवेत ते केले गेले नाहीत. रमाकांत खलप, रवी नाईक, आदी अनेक नेत्यांनी मंत्रिपदांचा अनुभव घेतला. त्यांना विषय कळला, तरी त्यांनीही आवश्यक कायदेशीर तरतुदी करून घेतल्या नाहीत किंवा तेवढा वेळ त्यांना मिळाला नसेल. मात्र, आता ती वेळ आलेली आहे. 

मुख्यमंत्र्यांना मुंडकारांविषयी कणव व प्रामाणिक तळमळ असल्याने त्यांना प्रत्यक्ष फिल्डवरच उतरावे लागेल. शौचालय किंवा घराची एक भिंत पडली तर ती बांधण्यासाठी भाटकाराचे पाय धरावे लागतात. ही स्थिती बदलणार नाही का? वीज व पाणी जोडणी तोडली गेल्यास भाटकारांविरुद्ध मुंडकारांनी पोलिसांत जावे, भाटकारांविरुद्ध कारवाई करू असे परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे स्वागतार्ह आहे, पण पोलिस खरोखर मुंडकारांची बाजू घेतील का, हे तपासून पाहावे लागेल.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत