शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री श्रेष्ठ की पक्ष? काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी घेतला भाजपचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 08:47 IST

मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते.

गोव्यातील भाजपचा ताबा काँग्रेसमधून आलेल्या अनेक नेत्यांनी घेतला आहे. मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते. भाजपने ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्ष निवडीचे नाट्य पार पाडले. लवकर एकदाचे मंडळ अध्यक्ष निवडण्याची सूचना दिल्लीहून येताच गोव्यातील भाजप नेते सोपस्कार पार पाडतात. पूर्वी अशाच प्रकारे सदस्य नोंदणी मोहीम उरकून चार ते पाच लाख सदस्य भाजपकडे असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले होते. प्रत्यक्षात दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवाराचा पराभव झाला. मग ते प्रचंड सदस्य गेले कुठे? संघटनात्मक निवडणुकीवेळी काही मंत्री व आमदारांनाच झुकते माप दिले जाते, ही निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची खंत आहे. 

फोंड्यात भाजप मंडळ अध्यक्ष निवडीबाबत मंत्री रवी नाईक यांनी स्वतःला हवे तेच केले. थिवीत मंत्री नीळकंठ हळर्णकर मात्र तसे करू शकले नाहीत. भाजपने निवडलेले काही मंडळ अध्यक्ष पक्षात कधी आले, त्यांनी पक्षाचे काम दहा वर्षे तरी केले का, असा प्रश्न निर्माण होतो. दाबोळी मतदारसंघात मंत्री माविन गुदिन्हो यांना हवा तोच मंडळ अध्यक्ष झाला. कुडचडे, कळंगुट व पेडणे मतदारसंघातही तसे घडले नाही. जिथे मंत्री बलाढ्य आहेत, तिथे पक्षाने मंत्र्यांचे ऐकले. नीलेश काब्राल जर मंत्रिपदी असते तर त्यांचेही ऐकले असते. काब्राल यांनी आपल्या मनातला सगळा राग परवा व्यक्त केलाच. कुडचडे मतदारसंघात प्रकल्प रखडले आहेत, आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून त्यासाठी सहकार्य मिळत नाही असे काब्राल यांनी सांगून टाकले. आपले मंत्रिपद वर्षभरापूर्वी काढले तेव्हा 'भिवपाची गरज ना' अशी ग्वाही देण्यात आली होती; पण कुडचडेत विकासकामांची गाडी पुढे गेलीच नाही, असे सांगत काब्राल यांनी नेतृत्वावर बाण सोडला.

मंत्री माविन यांनी गोव्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी सदानंद तानावडे हेच योग्य आहेत, असे प्रमाणपत्र दिले. २०२७ ची विधानसभा निवडणूक जर भाजपला सोपी जायची असेल तर तानावडे यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवावे लागेल, असे माविन सांगतात. म्हणजे एवढ्या मोठ्या पक्षात अजून एकही नवा दमदार प्रदेशाध्यक्ष तयार होऊ शकला नाही ? मंत्री माविन यांनी पूर्ण पक्षाचा अभ्यास केला आहे का ? अर्थात नरेंद्र सावईकर प्रदेशाध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत, असे चित्र निर्माण झाल्याने काही मंत्री, आमदार नाक मुरडू लागले आहेत, याची कल्पना येतेच. 

लोकसभा निवडणुकीवेळीदेखील सावईकर यांना तिकीट मिळू नये म्हणून काही नेत्यांनी पडद्याआड राहून गेम खेळला होताच. वास्तविक जे काँग्रेस पक्षात चालते, तेच भाजपमध्ये चालते. फक्त काहीवेळा पक्षशिस्त किंवा शिष्टाचाराच्या आवरणाखाली पक्षातील असंतोष मीडियापर्यंत पोहोचू दिला जात नाही. आता दामू नाईक, दयानंद मांद्रेकर, बाबू कवळेकर, दिलीप परुळेकर असे अनेकजण प्रदेशाध्यक्षपद मिळवू पाहत आहेत; मात्र माविन यांना त्यांच्यात कुणी पात्र दिसत नाही. तानावडे यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने निश्चितच चांगले काम केले. त्यांनी पक्ष मजबूत केला; मात्र ते आता राज्यसभा खासदार झाले असल्याने पक्षातील काही अनुभवी नेत्यांना आपणही प्रदेशाध्यक्ष व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे.

पणजीत मंडळ अध्यक्ष निवडीवेळी संजीव देसाई यांनी भाषण केले. देसाई हे पणजी मंडळाचे मावळते अध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपकडे दोषाचे बोट दाखविले, पण मंत्री बाबूश मोन्सेरात यांना मात्र छानपैकी क्लीन चीट दिली. एकवेळ भाजपकडून कोणाच्या तरी बदल्या कर किंवा अन्य प्रकारे सूड उगवला जातो, पण बाबूश कधी सूड घेत नाहीत, असे संजीव देसाई म्हणाले. याबाबतचा व्हिडीओ पाहून लोकांनी आपले मनोरंजन करून घेतले. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सर्व मंत्र्यांना सध्या डोक्यावर बसवत आहेत. समजा भविष्यात कधी रवी, सुभाष, दिगंबर कामत, विश्वजित, रोहन, बाबूश, माविन, बाबू कवळेकर, संकल्प वगैरेंनी भाजपला रामराम म्हटले तर किती मंडळ अध्यक्ष व किती कार्यकर्ते पक्षासोबत राहतील ? तूर्त एवढेच पुरे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस