शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

मंत्री श्रेष्ठ की पक्ष? काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांनी घेतला भाजपचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 08:47 IST

मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते.

गोव्यातील भाजपचा ताबा काँग्रेसमधून आलेल्या अनेक नेत्यांनी घेतला आहे. मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर किंवा अन्य काही नेत्यांकडून केली जाणारी विधाने किंवा खेळल्या जाणाऱ्या चाली पाहिल्यास बरेच काही कळून येते. भाजपने ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्ष निवडीचे नाट्य पार पाडले. लवकर एकदाचे मंडळ अध्यक्ष निवडण्याची सूचना दिल्लीहून येताच गोव्यातील भाजप नेते सोपस्कार पार पाडतात. पूर्वी अशाच प्रकारे सदस्य नोंदणी मोहीम उरकून चार ते पाच लाख सदस्य भाजपकडे असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले होते. प्रत्यक्षात दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवाराचा पराभव झाला. मग ते प्रचंड सदस्य गेले कुठे? संघटनात्मक निवडणुकीवेळी काही मंत्री व आमदारांनाच झुकते माप दिले जाते, ही निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची खंत आहे. 

फोंड्यात भाजप मंडळ अध्यक्ष निवडीबाबत मंत्री रवी नाईक यांनी स्वतःला हवे तेच केले. थिवीत मंत्री नीळकंठ हळर्णकर मात्र तसे करू शकले नाहीत. भाजपने निवडलेले काही मंडळ अध्यक्ष पक्षात कधी आले, त्यांनी पक्षाचे काम दहा वर्षे तरी केले का, असा प्रश्न निर्माण होतो. दाबोळी मतदारसंघात मंत्री माविन गुदिन्हो यांना हवा तोच मंडळ अध्यक्ष झाला. कुडचडे, कळंगुट व पेडणे मतदारसंघातही तसे घडले नाही. जिथे मंत्री बलाढ्य आहेत, तिथे पक्षाने मंत्र्यांचे ऐकले. नीलेश काब्राल जर मंत्रिपदी असते तर त्यांचेही ऐकले असते. काब्राल यांनी आपल्या मनातला सगळा राग परवा व्यक्त केलाच. कुडचडे मतदारसंघात प्रकल्प रखडले आहेत, आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून त्यासाठी सहकार्य मिळत नाही असे काब्राल यांनी सांगून टाकले. आपले मंत्रिपद वर्षभरापूर्वी काढले तेव्हा 'भिवपाची गरज ना' अशी ग्वाही देण्यात आली होती; पण कुडचडेत विकासकामांची गाडी पुढे गेलीच नाही, असे सांगत काब्राल यांनी नेतृत्वावर बाण सोडला.

मंत्री माविन यांनी गोव्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी सदानंद तानावडे हेच योग्य आहेत, असे प्रमाणपत्र दिले. २०२७ ची विधानसभा निवडणूक जर भाजपला सोपी जायची असेल तर तानावडे यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवावे लागेल, असे माविन सांगतात. म्हणजे एवढ्या मोठ्या पक्षात अजून एकही नवा दमदार प्रदेशाध्यक्ष तयार होऊ शकला नाही ? मंत्री माविन यांनी पूर्ण पक्षाचा अभ्यास केला आहे का ? अर्थात नरेंद्र सावईकर प्रदेशाध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत, असे चित्र निर्माण झाल्याने काही मंत्री, आमदार नाक मुरडू लागले आहेत, याची कल्पना येतेच. 

लोकसभा निवडणुकीवेळीदेखील सावईकर यांना तिकीट मिळू नये म्हणून काही नेत्यांनी पडद्याआड राहून गेम खेळला होताच. वास्तविक जे काँग्रेस पक्षात चालते, तेच भाजपमध्ये चालते. फक्त काहीवेळा पक्षशिस्त किंवा शिष्टाचाराच्या आवरणाखाली पक्षातील असंतोष मीडियापर्यंत पोहोचू दिला जात नाही. आता दामू नाईक, दयानंद मांद्रेकर, बाबू कवळेकर, दिलीप परुळेकर असे अनेकजण प्रदेशाध्यक्षपद मिळवू पाहत आहेत; मात्र माविन यांना त्यांच्यात कुणी पात्र दिसत नाही. तानावडे यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने निश्चितच चांगले काम केले. त्यांनी पक्ष मजबूत केला; मात्र ते आता राज्यसभा खासदार झाले असल्याने पक्षातील काही अनुभवी नेत्यांना आपणही प्रदेशाध्यक्ष व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे.

पणजीत मंडळ अध्यक्ष निवडीवेळी संजीव देसाई यांनी भाषण केले. देसाई हे पणजी मंडळाचे मावळते अध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपकडे दोषाचे बोट दाखविले, पण मंत्री बाबूश मोन्सेरात यांना मात्र छानपैकी क्लीन चीट दिली. एकवेळ भाजपकडून कोणाच्या तरी बदल्या कर किंवा अन्य प्रकारे सूड उगवला जातो, पण बाबूश कधी सूड घेत नाहीत, असे संजीव देसाई म्हणाले. याबाबतचा व्हिडीओ पाहून लोकांनी आपले मनोरंजन करून घेतले. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सर्व मंत्र्यांना सध्या डोक्यावर बसवत आहेत. समजा भविष्यात कधी रवी, सुभाष, दिगंबर कामत, विश्वजित, रोहन, बाबूश, माविन, बाबू कवळेकर, संकल्प वगैरेंनी भाजपला रामराम म्हटले तर किती मंडळ अध्यक्ष व किती कार्यकर्ते पक्षासोबत राहतील ? तूर्त एवढेच पुरे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस