शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या संजीवनी साखर कारखान्यात 58 हजार क्विंटल साखर विक्रीसाठी पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 14:53 IST

गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे.

ठळक मुद्देसंजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडूनधारबांदोडा तालुक्यातील दयानंद नगर येथे असलेला 46 वर्षे हा जुना कारखाना सध्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. ऑक्टोबर आणि जवळपास नोव्हेंबर असे दोन महिने उलटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पणजी - गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे.

धारबांदोडा तालुक्यातील दयानंद नगर येथे असलेला 46 वर्षे हा जुना कारखाना सध्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. राजकारण्यांची सहकार क्षेत्राकडील अनास्था तसेच या साखर कारखान्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे या कारखान्यातून फारसे मोठे उत्पन्न सरकार येऊ शकले नाही. गेल्या 46 वर्षांच्या काळात नेहमीच तोटा होत राहिला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याच्या ठिकाणी झालेले हवा आणि पाणी प्रदूषणाची गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ हा कारखाना बंद करण्याचा आदेश दिला होता या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस उत्पादकांचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संजीवनी सहकारी साखर कारखान्याला ऊस गेला नाही तर पाठवायचा कुठे? असा प्रश्न उत्पादकांसमोर आहे. या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केलेली आहे.

मध्यंतरी या कारखान्यातील मळीपासून वीज निर्मितीचा प्रस्ताव होता परंतु तोही बारगळला. कारखाना नफ्यात आणण्यासाठी तसेच कारखान्यात सुधारणा घडून आणण्यासाठी कोल्हापूरच्या तज्ञ मंडळींना आणले परंतु त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सरकार करू शकले नाही. या भागाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन 5 डिसेंबरपर्यंत कारखाना सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. गावकर हे अपक्ष असले तरी सध्या सरकार बरोबर आहेत आणि सरकारला त्यांनी हा इशारा दिला आहे. 

गळीत हंगाम सुरू व्हायला हवा होता परंतु तो सुरू होऊ शकलेला नाही. ऑक्टोबर आणि जवळपास नोव्हेंबर असे दोन महिने उलटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी  मोठे आंदोलनही करून महामार्ग रोखण्याचा इशारा दिला. गेल्या मोसमात या कारखान्याला सुमारे 8 कोटी रुपये तोटा झाला. सरकार आणि कारखाना यांच्यातील समन्वयाअभावी साखरी विक्रीविना पडून राहिली. कारखान्यात तांत्रिकी बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले होते. गेल्या गळीत हंगामात मध्यंतरी  कंडेन्सर पंप निकामी झाल्याने तीन दिवस कारखाना बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंडेन्सर पंप दुरुस्त करण्यास स्थानिक अभियंत्यांना अपयश आल्याने अखेर पुणे येथील वसंतदादा साखर कारखान्यातून तज्ञांना पाचारण करावे लागले होते

गेल्या नोव्हेंबरमध्ये 20 दिवस कारखाना बंद होता ऊस कापून कारखान्यासाठी पाठवला होता परंतु तो पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी गळीत हंगामात सुमारे 59,790 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले. यात 34,766 मेट्रिक टन ऊस गोव्याचा तर 26,046 मेट्रिक टन ऊस शेजारी राज्यातील होता. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च येतो.

टॅग्स :goaगोवाSugar factoryसाखर कारखाने